शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

किसान सभेचा मोर्चा धडकला

By admin | Published: June 24, 2016 12:05 AM

विभागीय कार्यालय : पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ

नाशिकरोड : नाशिक विभाग वृक्षारोपण संदर्भात आढावा बैठकीस वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गुरुवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात येणार असल्याच्या माहितीनंतर नाशिक जिल्हा किसान सभेने हजारो आदिवासींना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. नाशिक जिल्हा किसान सभेने वनाधिकार कायद्याची २००८ पासून चुकीच्या पद्धतीने झालेली अंमलबजावणी व इतर विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा किसान सभेने हजारो आदिवासी बांधवांचा गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. यापूर्वीच्या किसान सभेच्या आंदोलनाची दखल घेत पोलीस प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी व नियोजन केले होते.दरम्यान नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात राज्यात १ जुलै रोजी २ कोटी वृक्षाची लागवड करण्यात येणार असून त्यासंदर्भात नाशिक विभागाच्या आढावा बैठकीला वित्त, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगट्टीवार, गृहराज्यमंत्री राम शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे दुपारी ४ वाजेच्या सुमारास येणार असल्याची माहिती किसान सभेला मिळाली.पोलिसांची चांगलीच तारांबळकिसान सभेने हजारो आदिवासींना जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्याचे आवाहन करताच आदिवासी बांधव, महिलांनी खचाखच भरलेली शेकडो वाहने दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाशिकरोडच्या दिशेने निघाली. किसान सभेने ऐनवेळी मोर्चाचे ठिकाण बदलल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. पोलीस प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालय येथे जाणाऱ्या नाशिकरोड पोलीस ठाण्याशेजारील मेनगेट रस्त्यावर ५०० मीटर अगोदरच रस्त्यावर बॅरिकेड्स टाकून रस्ता बंद केला. तसेच जेलरोड कोठारी कन्या शाळेशेजारून जाणारा रस्ता बंद केला. पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, विजय पाटील, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले. खुद्द आयुक्त एस. जगन्नाथन हे घटनास्थळी दाखल झाले. किसान सभेचे पदाधिकारी व हजारो आदिवासी बांधव विभागीय आयुक्त कार्यालय मार्गावर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मोर्चा अडविला. पदाधिकाऱ्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन द्यायचे आहे असे प्रशासनाला सांगितले. दुपारी ३.३० ते ५.३० पर्यंत मोर्चेकऱ्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. साडेचार वाजेच्या सुमारास भारत प्रतिभूती मुद्रणालय सुटल्यानंतर पोलिसांनी प्रेस कामगारांना विनंती करत दुसऱ्या मार्गावरून जाण्यास सांगितले. मोर्चेकरी शिष्टमंडळाची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा होऊन निवेदन दिल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास मोर्चेकरी पुन्हा माघारीच्या दिशेने निघाल्यानंतर पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)