शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
4
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
5
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
6
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
7
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
8
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
9
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
11
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
12
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
13
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
14
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

येवल्यातील शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 5:42 PM

जळगाव नेऊर : पालखेड कालवा सल्लागार समितीच्या अकरा डिसेंबर रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार बैठकीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन शेतकर्‍यांच्या गरजा व मागणी विचारात घेऊन पाणी आवर्तनाचे रब्बी व उन्हाळ्यासाठी नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या.

ठळक मुद्देरब्बीची पिके : तारखा जाहीर न केल्याने शेतकरी संभ्रमात

जळगाव नेऊर : पालखेड कालवा सल्लागार समितीच्या अकरा डिसेंबर रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार बैठकीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन शेतकर्‍यांच्या गरजा व मागणी विचारात घेऊन पाणी आवर्तनाचे रब्बी व उन्हाळ्यासाठी नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या.पण कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन पंधरा दिवस उलटूनही पाणी आवर्तनाबाबत कोणत्याही तारखा जाहीर न झाल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहे,कारण ११ डिसेंबर रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन पालखेड डावा कालव्याला दोन आवर्तनाची घोषणा करण्यात आली, पण तारखा जाहीर न झाल्याने व पाणी मागणी अर्जाची मुदत ३० डिसेंबर पर्यंत असल्याने पालखेड डावा कालव्याचे आवर्तन केव्हा येणार ? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे,याबाबत पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांची पाण्याची मागणी नसल्याने आवर्तनाबाबत निर्णय घेता येत नसल्याचे सांगण्यात आले . येवला पश्चिम भागातील चारी क्रमांक,२८ व २९ वरील तसेच कालव्यालगत अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठल्याने रब्बीची पिके आवर्तनाच्या प्रतीक्षेत असुन जानेवारीच्या सुरुवातीला आवर्तन सोडण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे . कारण आवर्तन सुटल्यानंतरही पाणी अगोदर पूर्व भागात जाणार असल्याने व नंतर पश्चिम भागात पाणी सुटणार असल्याने त्यामध्ये पंधरा दिवसाचा कालावधी लोटणार असल्याने पाणी लवकर सुटल्यास शेतकऱ्यांचे कांदा,गहू, हरभरा, मका या पिकांना मदत होणार आहे.यावर्षी परतीचा पाऊस जास्त दिवस लांबल्याने शेतकऱ्यांची रब्बीची पिके उशीरा झाली, नदीलगत शेतकऱ्यांना पाणी आहे पण मोठ्या प्रमाणात शेतकरी पाटाच्या पाण्यावर अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांची पिके आवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे.प्रतिक्रिया...आमच्या २८ नंबर वितरिकेवर बहुतेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला असून ऐन मोसमात पाणी कमी पडल्याने शेतकऱ्यांची पिके कोमेजली आहे. तर काहींच्या कांदा लागवडी खोळंबल्या आहे. शेतकऱ्यांची आता सर्व आशा पालखेड डावा कालव्यावर आहे तरी पाटबंधारे खात्याने जानेवारीच्या सुरुवातीला आवर्तन दिल्यास गहु, हरभरा, कांदा पिकांना फायदा होणार आहे.- मल्हारी दराडे, अध्यक्ष मतोबा पाणीवापर संस्था.कालवा सल्लागार समितीच्या मीटिंगमध्ये २० जानेवारी च्या आसपास पाणी आवर्तन सोडण्याबाबत चर्चा झाली असून पाणी वापर संस्थांनी अर्ज भरून मागणी केल्यास त्या अगोदरही पाणी आवर्तनाबाबत विचार केला जाईल.- संभाजी पाटील, अभियंता पाटबंधारे उपविभाग, येवला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती