शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

निसाका-रासाका कार्यान्वित करण्यासाठी अजित पवार यांच्या दालनासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:35 IST

सायखेडा : निफाड सहकारी साखर कारखाना व रानवड साखर कारखाना चालू गळीत हंगामात कार्यान्वित करून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गतवर्षी विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळावा या मागणीसाठी करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी पवार यांच्या दालनात बुधवारी (दि.२) धडक देत आमरण उपोषण करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देसायखेडा : मंत्रालयात भेट घेऊन खंडू बोडके-पाटील यांची घेतली दखल

सायखेडा : निफाड सहकारी साखर कारखाना व रानवड साखर कारखाना चालू गळीत हंगामात कार्यान्वित करून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गतवर्षी विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळावा या मागणीसाठी करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी पवार यांच्या दालनात बुधवारी (दि.२) धडक देत आमरण उपोषण करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान मंत्रालय पोलिसांनी कोविडमुळे अजित पवार यांच्या दालनात उपोषणास प्रतिबंध केला. तरीही खंडू बोडके-पाटील आंदोलनावर ठाम असल्याने दालनात उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ दखल घेत माजी आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत खंडू बोडके-पाटील यांना चर्चेसाठी पाचारण करून निवेदन स्वीकारत सविस्तर चर्चा केली.!निफाड सहकारी साखर कारखाना कार्यान्वित करण्यासाठी प्राधान्य देऊन रासाकाची तत्काळ निविदा काढण्याची मागणी यावेळी अजित पवार यांच्याकडे खंडू बोडके-पाटील यांनी केली. त्याबाबत अजित पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी लवकरच चर्चा करून सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पवार यांनी सहकारमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. मात्र आपण निफाडकरांना दिलेला शब्द ज्ञात असून निसाका-रासाकाबाबत तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले. माजी आमदार अनिल कदम यांनीही यावेळी शिष्टमंडळासमवेत अजित पवार व बाळासाहेब पाटील यांना महाआघाडीचे सरकार असल्याने कारखाने कार्यान्वित करण्यासाठी राजकारणविरहित साकडे घातले.. यावेळी शिष्टमंडळामध्ये पंचायत समिती सभापती शंकर संगमनेरे, शहाजी राजोळे, संदीप टर्ले, देवेंद्र काजळे, समीर जोशी, बाळासाहेब पावशे, दत्तू भुसारे, सागर जाधव, नंदू राजोळे, राजेंद्र राजोळे, नितीन निकम, योगेश बोराडे, नंदू निर्भवणे, आप्पा राजोळे, अनिल जोगदंड, बाळासाहेब कानडे, रमजू तांबोळी, नितीन मोगल, रामा शिंदे आदी उपस्थित होते.मंत्रालयात कोरोनाचे कारण देत अजित पवार यांच्या दालनाबाहेर आमरण उपोषणास पोलिसांनी प्रतिबंध केला असला तरी अजित पवार यांनी दखल घेत कारखान्या बाबत चर्चा केली. मात्र कोरोनाचे कारण देत निसाकाबाबत ठोस आश्वासन न दिल्याने आपले समाधान झाले नसून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर जबाबदारी ढकलून अजित पवार यांनी टोलवाटोलवी केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निसाका-रासाकाचा संघर्ष सुरूच ठेवणार आहे.- खंडू बोडके-पाटील, माजी सरपंच, करंजगाव. 

टॅग्स :GovernmentसरकारStrikeसंप