अभोणा : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या सात-आठ दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून, रात्री शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी चांगले वातावरण असून, तालुक्यातील अभोणा परिसरात गेल्या आठ-दहा दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने रात्रीच्या वेळेस ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्याचे दिसू लागले आहे.चालू वर्षी सर्वत्र चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने जमिनीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अजूनही नदी-नाले भरून वाहत आहेत. (वार्ताहर)
अभोण्यात शेकोट्या
By admin | Published: January 05, 2017 1:13 AM