शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

भगूर-लहवित रस्त्याचे सव्वा कोटी ‘पाण्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 1:13 AM

येथील स्वामी समर्थ मंदिर ते सावन विलापर्यंत नुकताच सव्वा कोटी रुपये खर्चून बांधलेल्या भगूर-लहवित रस्त्याचे काँक्रिटीकरण चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून तो वाहतुकीस अयोग्य ठरला आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

भगूर : येथील स्वामी समर्थ मंदिर ते सावन विलापर्यंत नुकताच सव्वा कोटी रुपये खर्चून बांधलेल्या भगूर-लहवित रस्त्याचे काँक्रिटीकरण चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून तो वाहतुकीस अयोग्य ठरला आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.  भगूरचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता अनेक वर्षे न्यायालयीन वादात अडकला होता नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर भगूर नगरपालिकेने रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी घाईघाईने निर्णय घेऊन तांत्रिक सपाटीकरण न चुकीच्या पद्धतीने करून, साधारण एक कोटी ३५ रुपये खर्च करण्यात आले. रस्त्याच्या बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइप न टाकता कथडा बांधल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा न होता ते रस्त्यावरच साचत आहे. वाहकधारकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत असून, रविवारच्या किरकोळ पावसाने या रस्त्यावर पाणी साचले, पावसाळ्यात तर रस्त्यावर हौदासारखी परिस्थिती होईल, असे बोलले जात आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने अपघाताची भितीही व्यक्त केली जात आहे. इगतपुरीला जोडणाऱ्या या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये याकरिता भगूर पालिकेने दखल घेऊन या रस्त्याची फेरदुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत विरोधी पक्षाचे नगरसेवक तथा भगूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोहन भिकाजी करंजकर यांनी सांगितले की, भगूर नगरपालिकेने रस्त्याची परिस्थिती न पाहता, अतांत्रिक पद्धतीने तो बांधला तसेच रस्त्याला कथडा केल्यामुळे पाणी साचते.न्यायालयात दावाभगूरचे माजी नगराध्यक्ष पां. भा. करंजकर याच्या मालकीची जागा या रस्त्यात जात असून, त्याचा मोबदला मिळावा म्हणून करंजकर यांनी न्यायालयात दावा दाखल करून पालिकेकडे पैशाची मागणी केली आहे. त्यामुळेच नगरपालिकेने घाईघाईने रस्ता तयार केल्यामुळे तो चुकीचा झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक