शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

फरशी पूल बनले धोकेदायक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 9:44 PM

कळवण : मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्यूसेस पूरपाण्यामुळे धरणाखालील पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे गिरणा नदीवर असलेला पूल धोकादायक बनला आहे. चणकापूर धरणावर चणकापूर येथून जाताना म्हशाड नाल्यावरील फरशी पूलदेखील धोकादायक झाला असून, पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षित होत आहे.

कळवण : मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्यूसेस पूरपाण्यामुळे धरणाखालील पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे गिरणा नदीवर असलेला पूल धोकादायक बनला आहे. चणकापूर धरणावर चणकापूर येथून जाताना म्हशाड नाल्यावरील फरशी पूलदेखील धोकादायक झाला असून, पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षित होत आहे.कोट्यवधी रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाने मजबूत पुलाची शास्रशुद्ध पद्धतीने बांधणी केली. मात्र पूरपाण्याच्या प्रवाहामुळे पुलासाठी टाकण्यात आलेला भराव व पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे पुलाच्या दुरुस्तीची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.चणकापूर परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन पुलावरून प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांना कसरत करत वाट काढावी लागत आहे. चणकापूर भागातून कनाशी भागात जाण्यासाठी अभोणामार्गे अधिक अंतर पडत असल्यामुळे कमी वेळात व कमी अंतरात कनाशी गाठण्यासाठी धरणाखालील रस्ता हा जवळचा आहे. त्यामुळे पुलावरील वर्दळ वाढली होती. शिवाय चणकापूर येथे पर्यटनासाठी येणारे पर्यटक अर्जुनसागर (पुनंद), भेगू, सापुतारा येथे जाण्यासाठी या पुलाचा वापर करतात. चणकापूर धरणातून आवर्तन सोडल्यानंतर परिसरातील पर्यटक चणकापूर धबधबा परिसरात गर्दी करतात. या धबधब्यावर जाण्यासाठी पुलाचा मार्ग सोयीस्कर ठरतो. एकदिवसीय सहलीसाठी तालुक्यातील पर्यटकांची पहिली पसंती चणकापूर असते. निसर्गाचे वरदान लाभलेला हा परिसर पावसाळ्यात व धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यानंतर निर्माण होणाऱ्या धबधब्यामुळे आकर्षणाचे केंद्र ठरतो.तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात पाणी सोडल्याने धबधब्यांचे सौंदर्य जवळून न्याहाळता येते. कनाशीकडून येणाºया रस्त्यावर घनदाट वृक्षराई पर्यटकांना नेहमीच खुणावत असते.उन्हाळ्यात येथे चौपाटी व वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात. त्यामुळे धरणाखालील पूल पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. मात्र सद्य:स्थितीत परिसरातील गिरणा नदीवरील पुलाची दुरवस्था झाल्याने व पुलाचा काही भाग वाहून गेल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. संबंधित विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक