शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वनविभाग करणार १ कोटी ९२ लाख रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 01:06 IST

५० कोटी वृक्षलागवडीचा अखेरचा ३३ कोटी वृक्षलागवडीचा टप्पा यावर्षी पार पडणार आहे. याअंतर्गत नाशिक जिल्ह्याला एक कोटी ९२ लाख ३० हजार रोपांचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. याबाबत उपवनसंरक्षक शिवाजीराव फुले यांच्याशी साधलेला संवाद

५० कोटी वृक्षलागवडीचा अखेरचा ३३ कोटी वृक्षलागवडीचा टप्पा यावर्षी पार पडणार आहे. याअंतर्गत नाशिक जिल्ह्याला एक कोटी ९२ लाख ३० हजार रोपांचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. याबाबत उपवनसंरक्षक शिवाजीराव फुले यांच्याशी साधलेला संवादयंदा जिल्ह्याला किती रोपे लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे? त्यानुसार कशी तयारी सुरू आहे?जिल्ह्याला यावर्षी १ कोटी ९२ लाख ३० हजार रोपांच्या लागवडीचे लक्ष्य देण्यात आले आहे. नाशिक पूर्व, पश्चिम वनविभागासह सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळासह अन्य सरकारी, निमसरकारी यंत्रणाही सहभागी होणार आहेत. त्यादृष्टीने वनविभागाकडून सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. जवळपास जिल्ह्यात पूर्व, पश्चिम विभागात तसेच सामाजिक वनीकरणाच्या अखत्यारितीत असलेल्या क्षेत्रात खड्डे खोदण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. नाशिक पश्चिम विभागाला २६, तर पूर्व विभागाला २८ लाख रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.रोपांच्या उपलब्धेबाबत काय सांगाल? सामाजिक वनीकरण, वनविभागाच्या रोपवाटिकांमध्ये रोपेनिर्मिती मागील तीन वर्षांपासून केली जात आहे. रोजगार हमी योजनेतून रोपांच्या निर्मितीला प्राधान्य दिले गेले आहे. यावर्षीदेखील एकूण उद्दिष्ट लक्षात घेता सुमारे ५० लाख रोपे जिल्ह्यासाठी अतिरिक्त तयार आहेत. संपूर्ण जिल्ह्याकरिता वनविभागासह अन्य शासकीय यंत्रणा लक्षात घेऊन सुमारे २ कोटी ४३ लाख रोपे सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये बहुतांश रोपे ही दीड ते दोन वर्षे वाढ झालेली आहेत.रोपे लागवडीमध्ये कोणत्या प्रकारच्या प्रजातींवर भर दिला जाणार आहे?वनक्षेत्र वाढविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या अशा भारतीय प्रजातीच्या रोपांची निर्मितीवर भर दिला गेला आहे. यामध्ये प्रामुख्याने हिरडा, बेहडा, आवळा, बांबू, खैर, करंज, कडूनिंब, काशिद, शिवण, कांचन, ताम्हण, उंबर, अर्जुनसादडा, कदंब यांसारख्या विविध प्रजातींचा समावेश आहे.रोपे वाटप प्रक्रियेविषयी थोडक्यात सांगा?जूनअखेरपासून रोपांचे वाटप रोपवाटिकांमधून केले जाणार आहे. ग्रामपंचायती वगळता अन्य सर्व शासकीय, निमशासकीय, सामाजिक संस्थांना शासनाच्या सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला तीन हजार २०० रोपांचे कमाल उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.  त्यानुसार रोपे वाटप केली जातील.५० कोटी वृक्षलागवडीचे अभियान राज्य शासनाकडून सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा अखेरचा ३३ कोटी रोपे लागवडीचा टप्पा यावर्षी पार पडणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यात ८८ लाख रोपे वनविभाग, ८५ लाख रोपे सामाजिक वनीकरण, ४ लाख ३४ हजार रोपे वनविकास महामंडळ आणि २० लाख ७२ हजार रोपे ग्रामपंचायतींना लागवड करावयाची आहेत. त्यादृष्टीने तयारी अंतिम टप्प्यात सुरू असून, वनविभागाकडून ग्रामपंचायतींना मोफत रोपे पुरविली जाणार आहे.साडेतीन वर्षांत जिल्ह्यात एक कोटी तीन लाख रोपांची लागवडशासनाच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत २०१६ पासून अद्याप १ कोटी ३ लाख ७ हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी २०१६ साली वनविभागाकडून लावलेल्या रोपांपैकी ७३.३३ टक्के, २०१७ साली ८३.९९ टक्के तर १०१८ साली ९४ टक्के इतके रोपे आॅक्टोबरअखेर जीवंत राहिल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग