शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

सरकार आपल्या दारी, दुष्काळ उरावरी; शिर्डी येथील शेतकरी संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 8:07 AM

ठाकरे यांनी सध्या पडणारा पाऊस असाच बरसत राहो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो व कारभार शून्य सरकार लवकर पडो. यासाठी साईबाबांना साकडे घातले. 

शिर्डी : सरकारची हाताळणी चुकते आहे. थापा मारणारे हे सरकार निर्घृण, निर्दयी व तिडवाकडं आहे. गद्दारी करून आमचे सरकार पाडले असले तरी जनतेला सामोरे जाण्याची त्यांच्यात हिंमत नाही. सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ उरावरी. अशी परिस्थिती सध्या असल्याची टीका माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत केली. शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजारांप्रमाणे तत्काळ नुकसान भरपाई द्या, वीज बिले माफ करा, अशी सरकारकडे मागणी करत ठाकरे यांनी सध्या पडणारा पाऊस असाच बरसत राहो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो व कारभार शून्य सरकार लवकर पडो. यासाठी साईबाबांना साकडे घातले. 

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या शेतकरी संवाद दौऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राहाता, कोपरगाव व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. यानंतर साईंचे दर्शन घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरवेळी अस्मानी नाही तर राजकारणाची सुलतानी शेतकऱ्यांना रडवतेय. मागील वर्षी अतिवृष्टीने झालेली नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. आतादुष्काळाचे पंचनामे कधी होतील व भरपाई कधी मिळेल, असा सवाल उपस्थित करतानाच एक रुपयात विमा हे थोतांड असल्याचा व विमा कंपन्यांच्या फायद्याचा व्यवहार सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

मी भारावून गेलो...आज काकडी येथे एका मुलाने शिदोरी दिली. याबाबत ठाकरे म्हणाले, शिदोरीमुळे मी भारावून गेलो. सत्ताधाऱ्यांना वाटत असेल पक्ष व वडील चोरले; पण जनता आणि आई-वडिलांचा आशीर्वाद आजही सोबत आहे. आपण ही शिदोरी खाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेshirdiशिर्डीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी