शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

चार पाड्यांमध्ये चार वनराई बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 7:24 PM

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात वनराई बंधारे बांधण्यास लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने १०१ किंवा त्यापेक्षा अधिक वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प लवकरच पूर्ण करणार असल्याचे या संकल्पनेचे जनक पोपट महाले व त्यांचे सहकारी यांनी सांगितले.

ठळक मुद्दे वनराई बंधाऱ्याचे महत्त्व पटले असल्याने ते स्वतःहून भाग घेत आहेत.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात वनराई बंधारे बांधण्यास लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने १०१ किंवा त्यापेक्षा अधिक वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प लवकरच पूर्ण करणार असल्याचे या संकल्पनेचे जनक पोपट महाले व त्यांचे सहकारी यांनी सांगितले.विशेष म्हणजे जलयुक्त शिवारमध्ये ज्या यंत्रणा कार्यरत होत्या, त्यातील कृषी विभागालादेखील वनराई बंधाऱ्याचे महत्त्व पटले असल्याने ते स्वतःहून भाग घेत आहेत.जलयुक्तला लोकसहभाग असताना सिमेंट आदी सामान खरेदीसाठी पैसे उपलब्ध होत होते. जलयुक्त शिवार योजनेचा उद्देश व वनराई बंधारे बांधून शेतीला पाणी उपलब्ध करणे, वापरण्यासाठी पाणी उपलब्ध करणे. वाहते पाणी असल्यास परिसरात परक्युलेशनमुळे ओलावा टिकून राहणे. त्या ओलाव्याचा उपयोग शेतीला करण्याचा उद्देश आहे. तथापि, एप्रिल, मे, जूनपर्यंत वनराई बंधाऱ्यात पाणी असणे गरजेचे आहे.खरशेत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावरपाडा मुरुमहट्टी येथे जवळपास ५०० रिकाम्या गोण्याचा आनओहळ येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. तर देवडोंगरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ३०० काकडदरीत २०० ओझरखेड, खडक ओहळ येथे प्रत्येकी ५० रिकाम्या गोणीत माती टाकून वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.यावेळी सरपंच विठ्ठल दळवी, भास्कर भोंबे, कृष्णा राऊत, हरिदास राऊत, अंबादास पवार, अंबादास गांगोडे, गोपाळ राऊत, तुकाराम राऊत, यादव पवार, लता पवार, मंदा पवार, अशोक कर्डेक, अशोक गायकवाड, संतोष गाडर, शमनोज चौधरी, भगवान चौधरी, चिमणा महाले, दिनेश भुसारे, भगवान भोये, किसन गांगोडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :water shortageपाणीकपातtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर