शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

चारशे पन्नास ट्रान्स्फाॅर्मर व्हेंटिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:14 AM

गोरख घुसळे, पाटोदा : येथील वीज वितरणच्या सबस्टेशन अंतर्गत गाव आणि परिसरातील गावांना तसेच वाडी-वस्त्यांना वीजपुरवठा सुरळीत व पुरेशा ...

गोरख घुसळे, पाटोदा : येथील वीज वितरणच्या सबस्टेशन अंतर्गत गाव आणि परिसरातील गावांना तसेच वाडी-वस्त्यांना वीजपुरवठा सुरळीत व पुरेशा दाबाने व्हावा यासाठी बसविण्यात आलेल्या सुमारे चारशे पन्नास ट्रान्स्फाॅर्मर्सची अवस्था बिकट झाली असून, ते अखेरची घटका मोजत व्हेंटिलेटरवर तग धरून आहेत.

ट्रान्स्फाॅर्मर्समध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज वितरणने झोपेचे सोंग न घेता पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पाटोदा येथील वीज वितरणच्या सबस्टेशनमधून पाटोदा, दहेगाव पाटोदा, ठाणगाव, पिंपरी, निलखेडे, सोमठाणदेश, आंबेगाव, शिरसगाव, वळदगाव, लौकी या गाव व वाड्या-वस्त्यांना वीजपुरवठा केला जात आहे. या भागातील सर्वच वीजवाहिन्या लोंबकळत्या स्थितीत असून अनेक खांबही वाकले आहेत. सर्वच ट्रान्स्फाॅर्मर्सवरील डिस्ट्रिब्युशनपेटीतील फ्यूज फुटलेल्या अवस्थेत असून फ्यूजऐवजी तारा वापरलेल्या असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

..................................................

मनुष्यहानीची भीती :

कोणत्याही ट्रान्स्फाॅर्मरच्या फ्यूजपेटीत एकही फ्यूज नाही. आलेल्या मुख्य वाहिनीलाच तारा जोडून पुढे पुरवठा दिला जात आहे. तसेच बाहेरील बाजूच्या मुख्य केबलवरील प्लॅस्टिक आवरण जळून गेलेल्या स्थितीत असून, संपूर्ण वाहिन्या उघड्या पडलेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत दुर्घटना घडून वित्त व मनुष्यहानीची भीती व्यक्त केली जात आहे.

...................................

महावितरणने तत्परता दाखवावी

शेतकरी अथवा सर्वसामान्य ग्राहकाकडे वीजबिल थकले तर महावितरण तत्परता दाखवून कोणतीही पूर्वसूचना न देता वीजजोडणी तोडून वीजपुरवठा खंडित करते, मात्र वीजवाहिन्या, वाकलेले खांब,ट्रान्स्फाॅर्मर,फ्यूज आदींची दुरुस्ती करण्यात महावितरणकडून अशी तत्परता का दाखवली जात नाही, असा सवाल वीजग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

...................................

रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले

रोहित्राकडे येणारा वीजवाहिन्यांचा सप्लाय लोंबकळणाऱ्या व फुटलेल्या चिमण्या वारा तसेच पावसामुळे होणारे ब्रेकडाऊन तसेच खांबावरील चिमणी (इन्सुलेटर) फुटल्याने वीज गूल होण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत डिस्ट्रिब्युशन बॉक्समधील गपमध्ये पावसाचे पाणी शिरताच ते खराब होणे, उघड्या केबलमध्ये पाणी गेल्याने केबल ब्लास्ट होणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याने बिघाड होऊन रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे विद्युत उपकरणांचे तसेच शेतकऱ्यांचे वीजपंप खराब होऊन आर्थिक नुकसान होत आहे. सर्वच रोहित्रांची दुरवस्था झाल्याने नागरिक वारंवार याबाबतची कल्पना अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी वर्गाला देत आले आहेत, मात्र कोणत्याही रोहित्राची दुरुस्ती केली जात नाही. (२६ पाटोदा १/२)

===Photopath===

260521\26nsk_4_26052021_13.jpg

===Caption===

२६ पाटोदा १/२