शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
4
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
5
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
6
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
7
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
8
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
9
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
10
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
11
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
12
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
13
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
14
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
15
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
16
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
17
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
18
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
19
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
20
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड

फळभाज्या दरात घसरण; आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:12 AM

पंचवटी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढल्याने फळभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढल्याने फळभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. साधारणपणे ३५ ते ४० टक्के बाजारभाव घसरलेले आहेत.  बाजार समितीत कारली, भोपळा, वांगी, भेंडी, दोडका, शिमला मिरची यांसारख्या फळभाज्यांची आवक होत आहे. पावसामुळे फळभाज्यांना पोषक वातावरण मिळत असल्याने उत्पादन वाढले आहे. शनिवारी बाजार समिती बंद असल्याने सकाळी व सायंकाळी या दोन्ही वेळेत फळभाज्या शेतकरी मोठ्या प्रमाणात भाज्या विक्रीसाठी घेऊन आले होते. नाशिकसह मुंबई, पुणे व अन्य जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावल्याने अन्य बाजारपेठेत पावसामुळे शेतमालाला उठाव नसल्याने बाजारभाव घसरलेले असल्याचे व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले. सोमवारी बाजार समितीत विक्र ीसाठी आलेल्या कारली १२ किलो जाळीला २०० रुपये असा बाजारभाव मिळाला. कारली ५०० रुपये जाळी दराने विक्री झाली होती. कारली पाठोपाठ भोपळा १८ नग १७० रुपये, शिमला मिरची ३०० रुपये जाळी म्हणजे २५ रुपये प्रती किलो दराने विक्र ी झाली, तर वांगी २५० रुपये (२० रुपये किलो) असा बाजारभाव मिळाला. पाऊस सुरू झाल्याने अन्य बाजारपेठेत शेतमालाला उठाव नसल्याने तसेच फळभाज्यांची काही प्रमाणात आवक वाढल्याने बाजारभावात काहीसी घसरण झाली आहे. टमाटा मालाची आवक कमीच असल्याने बाजारभाव टिकून आहेत.  दरम्यान, सिडको, इंदिरानगर, सातपूर भागातील छोट्या भाजीबाजारांमध्ये मात्र भाज्यांचे भाव जास्त असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.