शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

७४ कोटींच्या कामांतून ११८ गावांत स्वच्छ भारतची झलक

By धनंजय रिसोडकर | Updated: November 21, 2023 18:11 IST

या कामांची निविदा प्रक्रिया राबवून कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे

धनंजय रिसोडकर, नाशिक: जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील काही गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करून गावांचा कायापालट करण्याचा प्रयास केला जाणार आहे. जिल्ह्यातील ५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ११८ गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे होणार आहेत. त्यासाठी ७४.११ कोटींच्या कामांचे विकास आराखडे तयार झाले आहे. या कामांची निविदा प्रक्रिया राबवून कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या वतीने ‘स्वच्छ भारत मिशन’चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. त्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषदेला निधी आला आहे. या टप्प्यात सुरुवातीला ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी दिला जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ११८ गावांच्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या ७४ कोटींच्या कामांचा आराखडा तयार झाला आहे. पहिल्या टप्प्यात नदीकाठच्या गावांना प्राधान्य दिल्याचे सांगण्यात येते.

या गावांमधील कामाचे प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत पाच हजारांखालील लोकसंख्या असलेल्या गावांत घनकचऱ्यासाठी प्रतिव्यक्ती ६०, तर सांडपाण्यासाठी २८० रुपयांप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच ५ हजारांवरील लोकसंख्येच्या गावांत घनकचऱ्यासाठी प्रतिव्यक्ती ४५ रुपये; तर सांडपाण्यासाठी ६६० रुपयांप्रमाणे निधी दिला जाईल. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने या कामांचे विकास आराखडे तयार करून त्यांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक