शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बनावट औषध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यातच धन्यता : तपासात प्रगतीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 19:59 IST

नाशिक येथे नोव्हेंबर महिन्यात कृषी विभागाने कॅनडा कॉर्नर येथील परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या कंपनीवर छापा मारून लाखो रुपयांची बनावट औषधे व प्रतिबंधक रासायनिक द्रव्ये जप्त केली होती. विशेषत: द्राक्ष मण्यांच्या वाढीसाठी व वजन भरण्यासाठी महत्त्वाच्या असणा-या सीपीपीयू सारख्या महागड्या औषधांची नक्कल करण्याचा प्रकार

ठळक मुद्दे शेतकरी फसवणुकीला मिळते प्रोत्साहन

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत नामांकित कंपन्यांच्या नावांची हुबेहूब नक्कल करून बनावट औषधांची निर्मिती व विक्री करणारे मोठे रॅकेट राज्यात कार्यरत असून, त्यांना शोध घेऊन त्यांचे दुकान, गुदामावर छापा मारण्याची कठीण कारवाई कृषी विभाग करीत असला तरी, त्या संदर्भात दाखल होणा-या गुन्ह्याच्या तपासात पोलीस यंत्रणा अपुरी पडत असल्याचे आजवरच्या गुन्ह्यांच्या उलगड्यावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या आठ महिन्यांत विभागीय कृषी कार्यालयाने दीड डझनापेक्षा अधिक विक्रेत्यांवर कारवाई केली असली त्यातून पोलिसांना फारसे काही निष्पन्न करता आलेले नाही.

नाशिक येथे नोव्हेंबर महिन्यात कृषी विभागाने कॅनडा कॉर्नर येथील परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या कंपनीवर छापा मारून लाखो रुपयांची बनावट औषधे व प्रतिबंधक रासायनिक द्रव्ये जप्त केली होती. विशेषत: द्राक्ष मण्यांच्या वाढीसाठी व वजन भरण्यासाठी महत्त्वाच्या असणा-या सीपीपीयू सारख्या महागड्या औषधांची नक्कल करण्याचा प्रकार यामुळे उघडकीस आला होता. दुकानमालक राजेंद्र मोदी व त्याचा सहकारी भानुशाली या दोघांच्या विरोधात कृषी विभागाने सरकारवाडा पोलिसांत तक्रार दिली असली तरी, तपासात पोलीस फार प्रगती करू शकलेले नाही. संबंधित दुकानमालक मोदी याने सदरची औषधे कोठून आणली, कोणाकोणाला विक्री केली याची माहिती पोलीस काढू शकलेले नाही. त्यामुळे या गुन्ह्यावर फारसा प्रकाशझोत पडू शकला नसल्याने बनावट औषध विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. राज्यात अशा प्रकारची बोगस औषधांची विक्री करणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता कृषी विभाग व शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात आठ महिन्यांत सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात वेदांत अ‍ॅग्रो, नोबल अ‍ॅग्रो, सुशांत बाहेती केमिकल्स, परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन, भूमी अ‍ॅग्रो, महाफिड आदी कंपन्यांचा समावेश आहे. नाशिकबरोबरच विभागातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील बनावट औषध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील संशयित आरोपींकडून गुन्ह्यावर प्रकाशझोत टाकू शकणारी माहिती पोलीस काढू शकलेले नाहीत. त्यामुळे एका ठिकाणावर छापे पडले की जागा बदलून नवीन दुकान थाटण्याचा प्रकार घडू लागले असून, त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक अटळ झाली आहे. पोलीस यंत्रणेने अजूनही या साºया प्रकरणांना गांभीर्याने घेतल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीPoliceपोलिस