शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
3
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
4
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
5
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
6
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
7
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
8
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
9
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
10
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
11
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
12
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
13
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
14
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
15
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
16
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
17
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
18
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
19
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
20
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 

शासनाच्या कर्जमाफीचा काकडगावला निषेध

By admin | Published: June 29, 2017 12:57 AM

नामपूर : बागलाण तालुक्यातील काकडगाव येथील शेतकऱ्यांनी सोसायटीच्या कार्यालयात एकत्र येत सरसकट कर्जमाफी योजना फसवी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करून या कर्जमाफीचा निषेध केला आहे

  लोकमत न्यूज नेटवर्क

नामपूर : बागलाण तालुक्यातील काकडगाव येथील शेतकऱ्यांनी सोसायटीच्या कार्यालयात एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली सरसकट कर्जमाफी योजना फसवी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करून या कर्जमाफीचा निषेध केला आहे. ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. प्रत्यक्षात डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा हा प्रकार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या कर्जमाफीत जाचक अटी व नियम लावलेले आहेत. या योजनेत प्रत्येक गावात बोटावर मोजण्याइतकेसुद्धा शेतकरी बसलेले नाहीत. ज्या शेतकऱ्यांचे २०१२ पूर्वी कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिलेला नाही. यामुळे सन २००८ च्या कॉँग्रेस सरकारच्या काळात जे शेतकरी वंचित राहिले आहेत ते पुन्हा आजच्या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. वास्तविक हेच शेतकरी खऱ्या अर्थाने गरीब व गरजू आहेत. अशा शेतकऱ्यांचा आकडा खूप मोठा आहे. तसेच पोल्ट्री, विहीर, मोटार, गृहकर्ज आदींना या योजनेतून बाद केले आहे. याव्यतिरिक्त २०१६ हे वर्ष अंतिम थकबाकीचे वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ २५ हजार रुपये सूट देण्यात येणार आहे. मात्र यासाठी ३० जूनअखेर सर्व कर्जाची रक्कम भरावी लागणार आहे. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज रक्कम असेल तर वरची रक्कम रोख भरावी लागणार आहे. या कर्जमाफीतून शासकीय कर्मचाऱ्यांनाही वगळण्यात आले आहे. अशा कर्जदारांची संख्या मुळात कमी आहे. सरसकट कर्जमाफीचा शब्द वापरून त्यात एवढे निकष लावल्यामुळे ही कर्जमाफी नेमकी कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. आगामी काळात सरकारने कर्जमाफीबाबत स्पष्ट भूमिका न घेतल्यास संपूर्ण गावकरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कार्यालयातच आमरण उपोषण करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी सोसायटी अध्यक्ष रामू अहिरे, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, तंटामुक्त अध्यक्ष राजाराम पाटील, प्रगत शेतकरी पंडित पाटील, सरपंच निंबा सोनवणे, संचालक अजित अहिरे, शिवाजी अहिरे, सुरेश अहिरे, नंदलाल अहिरे, विनोद पाटील, विलास अहिरे, देवराव अहिरे, प्रशांत पवार, दादाजी सोनवणे, अभिमन पवार, बाजीराव अहिरे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. चौकट . सरसकट कर्जमाफीसाठी दिलेल्या अटी व नियम जाचक आहेत. अजून शासनाचे परिपत्रक प्राप्त न झाल्यामुळे नेमका लाभ कोणाला मिळेल, हे सांगणे आज तरी कठीण आहे. हेमंत भामरे, निरीक्षक, जिल्हा बॅँक, नामपूर फोटो ओळी . संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण शेतकरी आज शासनाच्या भूलथापांना बळी पडत असून, प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे दिसत आहे. मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून दिशाभूल करीत असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे. फसव्या सरसकट कर्जमाफीचा निषेध करण्यात आला. येत्या आठ दिवसात सरकारने वंचित शेतकऱ्यांचा विचार केला नाही तर यापुढे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही राजकीय नेत्याला काकडगावात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.