शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कांद्याचे दर पाडून सरकार साधते स्वार्थ : ललित बहाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2022 1:59 AM

गेल्या काही वर्षांपासून कांदा हा केवळ जीवनावश्यक राहिला नसून, त्याच्या दराबाबत राजकारण सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांवर उत्पादन शुल्क आणि ईडीकडून कारवाई करून कांद्याचे दर पाडले जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार न करता सरकार स्वार्थ साधत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी केला. असेच सुरू राहिले तर शेतकरी संघटना सरकारला वठणीवर आणण्याचे काम करेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

ठळक मुद्दे येवल्यातील कांदा परिषदेत सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल

येवला (जि. नाशिक) : गेल्या काही वर्षांपासून कांदा हा केवळ जीवनावश्यक राहिला नसून, त्याच्या दराबाबत राजकारण सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांवर उत्पादन शुल्क आणि ईडीकडून कारवाई करून कांद्याचे दर पाडले जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार न करता सरकार स्वार्थ साधत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी केला. असेच सुरू राहिले तर शेतकरी संघटना सरकारला वठणीवर आणण्याचे काम करेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित कांदा परिषदेत बहाळे बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात कमालीची घसरण झाली आहे. कांदा दराच्या घसरणीमागे केवळ परिस्थितीच नाही, तर मोठे राजकारण आहे. कांद्याचे दर घसरले असताना राज्यभर नाफेडकडून कवडीमोल दरात खरेदी केली जात आहे. उद्या शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याला चांगला दर मिळाला तर नाफेडचेच कांदे बाजारात आणून दर आवाक्यात आणले जातात. असा प्रकार निदर्शनास आला तर नाफेडचा कांदा बाजारपेठेत येऊ दिला जाणार नसल्याचे बहाळे यांनी सांगितले.

परिषदेत राजाभाऊ पुसदेकर, सीमा नरोडे, शशिकांत भदाणे, देवीदास पवार, सुधीर बिंदू, अनिल घनवट, माजी आमदार वामनराव चटप, रामचंद्रबापू पाटील, महिला आघाडी अध्यक्षा प्रज्ञाताई बापट, संतू पा. झांबरे, जिल्हाध्यक्ष शंकरराव ढिकले यांची भाषणे झाली. प्रास्ताविक, सूत्रसंचालन बापूसाहेब पगारे यांनी केले.

------------------

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदाagricultureशेती