शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
2
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
3
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
4
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
5
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
6
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
7
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
8
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
9
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
10
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
11
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
12
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
13
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
14
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
15
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."
16
आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?
17
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
18
Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम
19
India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
20
आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

शासनाकडून मागण्या मान्य करून घेणार

By admin | Published: June 26, 2017 12:41 AM

स्वामीनाथन आयोगातील शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्या शासनाच्या मानगुटीवर बसून मान्य करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला /पिंपळगाव बसवंत : दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी केली म्हणजे सर्व काही झाले असे सरकारने समजू नये. अन्य शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी कर्ज मर्यादेत वाढ करावी, जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा त्यात समावेश करावा, शेतमालाला हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगातील शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्या आम्ही शासनाच्या मानगुटीवर बसून मान्य करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील येवला, पिंपळगाव बसवंत, निफाड येथील दौऱ्याप्रसंगी दिली.कर्जमाफीच्या घोषणेनंतर शिवसेनेतर्फे रविवारी येवला शहरातील आसरा लॉन्स येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओझरपासून येवल्यापर्यंतच्या पट्ट्यातील शेतकरी आंदोलनाच्यावेळी रस्त्यावर उतरला आणि सरकारला आपली ताकद दाखवून दिली. या एकजुटीच्या जोरावर सरकार झुकले. म्हणूनच या बहादूर शेतकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी मी आलो आहे. कर्जमाफीचा नाशिक जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना लाभ मिळणार नसल्याने त्यांच्यात असंतोष आहे याची आपणास जाणीव आहे. असेही ते म्हणाले. सरकारने मार्च २०१६ पर्यंतच्या कर्जाबाबत निर्णय घेतला. पण मार्च २०१७ अखेरच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यास सरकारला आम्ही भाग पाडू. केवळ कर्जमुक्ती नाही तर, कांदा पिकासह अन्य शेतमालाला हमी भाव देण्यासाठी स्वामिनाथन आयोगातील शिफारशींची अंमलबजावणी करणे महत्वाचे असून शासनाला ती करावीच लागेल असेही ठाकरे यांनी नमूद केले.  यावेळी व्यासपीठावर, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आमदार अनिल कदम, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुनील शिंदे, माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, संभाजी पवार यांच्यासह शिवसेना नेते उपस्थित होते. प्रास्तविक दराडे यांनी तर स्वागत पवार यांनी केले.कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख वाल्मिक गोरे, तालुका प्रमुख झुंजार देशमुख, शहर प्रमुख राजेंद्र लोणारी, कुणाल दराडे, माजी नगरसेवक संजय कासार बाळासाहेब पिंपरकर, कांतीलाल साळवे, पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत, मकरंद सोनवणे, भास्कर कोंढरे, छगन आहेर, पंचायत समिती सदस्य अ‍ॅड मंगेश भगत, साहेबराव सैद, रतन बोरनारे, यांच्यासह शिवसैनिक व परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरकारला जाब विचारा च्दुष्काळाने जर्जर झालेला शेतकरी गारपिटीत सापडला, त्यानंतर नोटाबंदीच्या फंड्यात शेतकऱ्यांची रोकड थांबली. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले. जिल्हा बँकेत राजकारण आणून चेअरमन नरेंद्र दराडे यांना केवळ बदनाम केले गेले. चुका झाल्या असतील तर त्यांना पकडण्याची हिंमत दाखवा असे सांगतानाच जिल्हा बँकेत पडून राहिलेल्या पैशांचे व्याज कोण देणार? याचा जाब सरकारला विचारण्याचा आदेशच उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र दराडे यांना भाषणातून दिला. शेतकरी गुन्हेगार असतील तर सेना त्यांच्यासोबतच !शेतकऱ्यांना जर गुन्हेगार ठरवणार असाल तर, याच गुन्हेगारांबरोबर सेना आहे. पिंपळगावसह अन्य भागात झालेल्या शेतकरी आंदोलनातील गुन्हे मागे न घेतल्यास सेनेचा हिसका दाखवू असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांची यादीच सभेत मागवून ही यादी सरकारकडून रद्द करून घेणारच असा शब्द सभेत ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. सरकार सरळ न्याय देणार नसेल तर, दुसरी भाषा बोलावी लागेल. न्याय हक्क मिळवून देण्यासाठीच सेना आहे हा बाळासाहेबांचा शब्द खरा करवून दाखविण्याची गर्जनाही ठाकरे यांनी सभेत केली.