शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

किष्किंधा मुद्द्यावर गोविंदानंद पुन्हा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2022 1:38 AM

रामभक्त हनुमानाचे जन्मस्थळ नाशिकमधील अंजनेरी नसून कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा करणारे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी दुसऱ्या दिवशीही आक्रमक भूमिका घेत किष्किंधा मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले. अंजनेरीसंदर्भात सादर करण्यात आलेले पुरावे पुरेसे नसल्याचा दावा करीत त्यांना नाशिकमधील साधू महंतांना पुन्हा एकदा आव्हान दिले. दरम्यान, बुधवारी (दि. १) नाशिक सोडताना त्यांनी नाशिककरांना किष्किंधाला दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले.

नाशिक : रामभक्त हनुमानाचे जन्मस्थळ नाशिकमधील अंजनेरी नसून कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा करणारे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी दुसऱ्या दिवशीही आक्रमक भूमिका घेत किष्किंधा मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले. अंजनेरीसंदर्भात सादर करण्यात आलेले पुरावे पुरेसे नसल्याचा दावा करीत त्यांना नाशिकमधील साधू महंतांना पुन्हा एकदा आव्हान दिले. दरम्यान, बुधवारी (दि. १) नाशिक सोडताना त्यांनी नाशिककरांना किष्किंधाला दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्या गोविंदानंद सरस्वती यांनी मंगळवारी नाशिकमधील धर्मसभेनंतर रात्री उशिरा पुन्हा नाशिकचे साधू, महंत, अभ्यासक यांना आव्हान देत माध्यमांसमेार उत्तर परिषद घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी (दि.१) त्यांनी किष्किंधा मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी उत्तर कन्नड येथील गोकर्ण आणि आंध्रमधील तिरुमाला येथील हनुमान जन्मस्थळाचा मुद्दा मिटला असून, आता केवळ नाशिकच्या अंजनेरी येथील जन्मस्थळाचा मुद्दा असून, हा वाददेखील आपण धर्मशास्त्राच्या आधारावर सिद्ध करून दाखवू, असा पुनरुच्चार गोविंदानंद सरस्वती यांनी केला आहे.

नाशिकमधील साधू महंतांना अंजनेरीसंदर्भातील मांडलेले मुद्दे पुरेसे नाहीत. याशिवाय सरकारी गॅझेट हा पुरावा होऊ शकत नसल्याने वाल्मीकी रामायणमध्ये मांडलेले सर्व तथ्ये कर्नाटकातील किष्किंधा येथेच असल्याचे आपण सिद्ध केल्यामुळे अंजनेरी हनुमानाचे जन्मस्थळ नसल्याच्या मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकHanuman Jayantiहनुमान जयंती