शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

दुष्काळ जाहीर करण्यासाठी सायगावात ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 7:04 PM

येवला तालुक्याचा सतत अवर्षण प्रवण क्षेत्रातील उत्तरपूर्व भाग शासनाने तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावा, यासाठी सायगाव ग्रामस्थांनी दि. ५रोजीयेथील रोकडोबा पारावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करत ठराव केला.

येवला : येवला तालुक्याचा सतत अवर्षण प्रवण क्षेत्रातील उत्तरपूर्व भाग शासनाने तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावा, यासाठी सायगाव ग्रामस्थांनी दि. ५रोजीयेथील रोकडोबा पारावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करत ठराव केला. ठरावाच्या प्रती राज्य शासनाचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाला पाठविणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. योगिता भालेराव होत्या.येवला तालुक्याचा उत्तरपूर्व भाग सतत दुष्काळाच्या छायेत असतो. या भागातील शेतीला पर्यायी सिंचनाची सुविधा नसल्याने येथील शेती ही निसर्गाच्या लहरीवरच अवलंबुन आहे. अशा अत्यल्प पावसाने कधी खरीप तर कधी रब्बी हंगाम वाया जातो. चालु हंगामात आपुर्या पर्जन्यमानामुळे मका, बाजरी, कपाशी पिके करपली. उत्पादन खर्चही भागणार नाही,येवढे उत्पादन घटले. तरीहीराज्यात दुष्काळ जाहिर करतांना शासनाने येवला तालुका वगळला. सरकारच्या या भेदनितीचा सायगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेतुन खरपूस समाचार घेत जाहिर निषेध नोंदवला.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघाचे सल्लागार समतिीचे संचालक भागुनाथ उशीर म्हणाले की, येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भाग हा कायमच दुष्काळग्रस्त असून पन्नास टक्केंपेक्षा कमी पिक आणेवारी असणाº्या६४गावांचा समावेश गंभीर दुष्काळ म्हणून जाहिर करावी.मागील वर्षापासून आजतागायत उत्तरपूर्व भागातील१४गावांना ट्रँकरद्वारा पाणीपुरवठा केला जात आहे. येथील शेती निसर्गाच्या स्वाधीन आहे. चालु खरिप हंगामातील पिके उध्वस्त झाली. उत्पादन खर्चही न भागल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तत्वत: कर्जमाफिच्या दृष्टचक्र ात सापडलेल्या शेतकº्यांना दोन वर्षापासून पिककर्जाचे वाटप नाही. पिण्याच्या पाण्यासह गुरांच्या चारा पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. अशा भिषण परिस्थित शासनाने तात्काळ या भागातील गावांना दुष्काळ जाहिर करून न्याय द्यावा. अशी मागणी ग्रामस्थांनी केली. रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतमजूरांना गाव परिसरात रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते वसंतराव खैरनार यांनी केली.याप्रसंगी शरद भालेराव,शिवाजी भालेराव,अ‍ॅड. सुभाष भालेराव, उपसरपंच दिनेश खैरनार,संजय पेंढारे,गुलाबराव दारूंटे आदीनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी अ‍ॅड. आर.डी.खैरनार, विजय खैरनार, भागीनाथ उशीर,सुनिल देशमुख,गणपत खैरनार,गोरख भालेराव, बशीर शेख, रघुनाथ खैरनार, ज्ञानेश्वर भालेराव, गणपत उशीर, कचरू गाडेकर, छगन उशीर, प्रविण भालेराव, भाऊसाहेब आहिरे, बंडु निघुट, प्रल्हाद दारूंटे, संजय देशमुख,बाबुराव पठारे, दिलीप ढाकणे, लहानु भालेराव, कारभारी देव्हडे, आंबादास उशीर, प्रविण खैरनार, बबन ढाकणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेचे प्रास्ताविक व आभार ग्रामसेवक बोडखे यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ