मातोरी : गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे मातोरीसह परिसरातील पिकांचे नुकसान झाले असून सर्वाधिक फटका भुईमूग पिकास बसला आहे. भुईमुगाबरोबरच द्राक्ष आणि टोमॅटो पिकाचेदेखील नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली असून शेतपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न करावे लागले. भुईमूग शेंगा काढणी सुरू असतानाच पाऊस झाल्याने काढलेल्या शेंगा ओल्या झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर उभ्या असलेल्या भुईमुगावर आता रोग पडण्याचीदेखील शक्यता वर्तविली जात आहे. पिकांवर भुरी, डावण्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी पिकांवर बुरशीनाशक व किटकनाशक फवारणी सुरू केली आहे. यामुळे उत्पादनखर्च वाढणार आहे. (वार्ताहर)
पावसामुळे भुईमूग पिकास फटका
By admin | Published: November 22, 2015 11:47 PM