शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

अतिथी उद्गारतात, ‘वाह...नाशिक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:25 AM

नाशिक हे धार्मिक व निसर्ग पर्यटनाचे मुख्य केंद्र. कुंभनगरी ते देशाची ‘वाइन कॅपिटल’ अशी काळानुरूप ओळख निर्माण केलेल्या या शहराच्या विकासामध्ये भर पडली ती मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाची. उड्डाणपूल म्हणजे जणू नाशिकचा ‘नेकलेस’च. उड्डाणपुलाखाली जागेवरील सौंदर्यीकरण व सुशोभिकरणामुळे महामार्गावरून शहरात येणाºया अतिथींच्या मुखातून सहजरीत्या ‘वाह...नाशिक’ असे गौरवोद्गार पडत असावे.

नाशिक : नाशिक हे धार्मिक व निसर्ग पर्यटनाचे मुख्य केंद्र. कुंभनगरी ते देशाची ‘वाइन कॅपिटल’ अशी काळानुरूप ओळख निर्माण केलेल्या या शहराच्या विकासामध्ये भर पडली ती मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाची. उड्डाणपूल म्हणजे जणू नाशिकचा ‘नेकलेस’च. उड्डाणपुलाखाली जागेवरील सौंदर्यीकरण व सुशोभिकरणामुळे महामार्गावरून शहरात येणाºया अतिथींच्या मुखातून सहजरीत्या ‘वाह...नाशिक’ असे गौरवोद्गार पडत असावे. उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्य किंवा अतिक्रमण वाढीस लागू नये आणि शहराच्या सौंदर्यीकरणाला डाग लागू नये, यासाठी सुशोभिकरण करण्यात आले. त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर मधोमध हिरवाई बहरल्याचे चित्र पहावयास मिळते. हिरवळीचे कोंदण या जागेला लाभल्याने सौंदर्य खुलले आहे. य्मुळे उड्डाणपुलाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. केवळ सुशोभिकरणच नव्हे तर तात्यासाहेब अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे जन्मगाव म्हणून त्यांचे आकर्षक रेखाटलेल्या छायाचित्रांपासून तर रक्तदान, वृक्षदान, नेत्रदानासह बेटी बचाओ, बेटी पढाओ असा समाजप्रबोधनाचा दिलेला संदेश महामार्गावरून शहरात येणाºया पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच लाभलेले हिरवाईचे कोंदण आणि भिंतींसह खांबांवरील चित्राकृती बघून पाहुण्यांच्या मुखातून ‘वाह...नाशिक’ असे गौरवोद्गार सहज बाहेर पडतात.उड्डाणपुलाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून लक्ष वेधून घेत आहे. विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे येथे लावण्यात आली आहेत. तसेच उड्डाणपुलाच्या खांबांवर धावपटू कविता राऊतसह विविध चित्राकृती रेखाटण्यात आल्या आहेत. नाशिकच्या उड्डाणपुलाखाली करण्यात आलेले सौंदर्यीकरण अन्य शहरांमधील उड्डाणपुलासाठीदेखील आदर्श ठरणारे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका