शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
3
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
4
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
5
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
7
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
8
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
9
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
10
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
11
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
13
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
14
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
15
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
16
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
18
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
19
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

हॉटस्पॉट मालेगावमध्ये पुनश्च हरिओम!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 3:35 AM

कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के, आता फक्त ५५८ जण बाधित

धनंजय वाखारे ।

नाशिक : दाट लोकवस्ती, अज्ञान आणि अफवांचे होणारे संक्रमण, त्यातून प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेशी पुकारलेला असहकार या प्रमुख कारणांमुळे जिल्ह्यात कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेले मालेगाव शहर आता सावरू लागले असून परिस्थिती नियंत्रणात येत आहे. शहरात बाधितांची संख्या ८५८ वर जाऊन पोहोचली असतांना आजमितीला मालेगावमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के इतके आहे. त्यामुळे कोरोनाचा हॉटस्पॉट पुनश्च हरिओम म्हणण्याच्या तयारीला लागला आहे.

मालेगावी ६४ दिवसांत ६४ बळी घेणाऱ्या कोरोनाचा वाढता संसर्ग साºयाच यंत्रणेला आव्हान देणारा ठरला आणि सामूहिक प्रयत्नातून ‘मिशन रिलीफ मालेगाव’ सुरु झाले. शहरात दि. ८ एप्रिल रोजी एकाच वेळी ५ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते तर नाशिक जिल्ह्यातील पहिला बळीही मालेगावच्याच बाधित रुग्णाचा गेला. तेथून मालेगावी कोरोनाने आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली आणि मालेगाव कनेक्शनचा धोका संपूर्ण जिल्ह्याला उरात धडकी भरवणारा ठरला. बाधित आणि बळी यांची संख्या वेगाने वाढू लागली आणि प्रशासकीय यंत्रणा मुळापासून हादरली. अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या उचलबांगड्या करण्यात आल्या. प्रशासनाकडून यंत्रणेचे मनोबल उंचावतानाच कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक लागणाºया सोयी-सुविधांसह सुरक्षित साधनांची उबलब्धता करून देण्यात आली. दाट लोकवस्तीत वास्तव्य करणाºया नागरिकांचे युद्ध पातळीवर सर्वेक्षण केले गेले, रुग्णांचे ट्रेसिंग करून त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार सुरू करण्यात आले, बाधितांचे मनोधैर्य उंचावण्यासाठीही प्रयत्न झाले. परिणामी अज्ञान आणि अफवांच्या बाजारात गुंगलेले नागरिक हळूहळू तपासणीसाठी घराबाहेर पडू लागले. संपूर्ण रमजान काळात संक्रमणाचा सर्वाधिक धोका होता, परंतु पोलीस यंत्रणेने अडथळ्यांची शर्यत पार करत परिस्थिती संयमाने आणि हुशारीने हाताळली. नाशिक आणि धुळे येथे स्वाब नमुना तपासणीसाठी लॅब कार्यान्वित झाल्याने अहवाल वेगाने येण्यास सुरुवात होऊन तत्काळ उपचार करणेही शक्य झाले. त्यामुळे मालेगावमधील मृत्युदर घटत गेला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. आतापर्यंत एकूण ८५८ बाधितांमधून तब्बल ७१२ रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर सद्यस्थितीत ८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.पोलीस यंत्रणेचे कौशल्य अन् सतर्कतामालेगावमधील कोरोनाचा वाढता संसर्ग शासनालाही डोकेदुखी ठरला होता. शासनाने सर्वप्रथम यंत्रणेत खांदेपालट केली. यापूर्वी मालेगावी अपर पोलीस अधीक्षकपदी काम पाहिलेले आणि तेथील स्थानिक लोकांशी उर्दू, अरेबिक, फारसी भाषेत सवांद साधत कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे सुनील कडासने यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली.लॉक डाऊन काळात पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिह यांनी मालेगावी तळ ठोकला. १४० पोलीस कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाली. अशा स्थितीत त्यांनी पोलिसांचे मनोबल ढळू दिले नाही. पोलीस यंत्रणेचे कौशल्य आणि सतर्कता यामुळेही मालेगावी कोरोना आटोक्यात आणणे शक्य होत गेले.प्रशासनाचा समन्वयजिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी एकूण साºया परिस्थितीवर लक्ष ठेवत समन्वयाची बाजू हाताळली. मनपा आयुक्त दीपक कासार यांना कोरोनाची बाधा झाली होती. पण त्यांनीही कोरोनावर मात करत ‘शो मस्ट गो आॅन’ म्हणत महापालिका यंत्रणा कामाला लावली. सुमारे १८ डॉक्टरही बाधित झाले होते. पण आरोग्य यंत्रणेनेही हार न मानता कोरोनाशी लढा दिला.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या