शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
4
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
7
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
8
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
9
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
10
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
11
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
12
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
13
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
14
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
15
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
16
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
17
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
18
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
19
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
20
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
Daily Top 2Weekly Top 5

हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट का कापले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:53 IST

सर्वपक्षीय संबंध ही हरिश्चंद्र चव्हाण यांची जशी जमेची बाब तशी ती अडचणीत आणणारी ठरली. भाजपात येऊनही थेट संघटनेशी तुटलेली नाळ आणि सत्तेच्या विरोधातच घेतलेली भूमिका याबाबी चव्हाण यांची उमेदवारी कापण्यास कारणीभूत ठरल्या असल्याचे मानले जात आहे.

नाशिक : सर्वपक्षीय संबंध ही हरिश्चंद्र चव्हाण यांची जशी जमेची बाब तशी ती अडचणीत आणणारी ठरली. भाजपात येऊनही थेट संघटनेशी तुटलेली नाळ आणि सत्तेच्या विरोधातच घेतलेली भूमिका याबाबी चव्हाण यांची उमेदवारी कापण्यास कारणीभूत ठरल्या असल्याचे मानले जात आहे.माकपाचा बालेकिल्ला असलेल्या सुरगाणा तालुक्यात विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांनी अपक्ष निवडणूक लढवून बाजी मारली. त्यामुळे चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपाला आदिवासी क्षेत्रात विस्तार करण्याची संधी दिसत होती. चव्हाण यांनी अपेक्षेनुरूप लोकसभेत यश मिळविले. परंतु चव्हाण यांना पक्षाला न्याय देऊ शकले नाही. भाजपाने संघटनात्मक वाढीचा कार्यक्रम आखला. परंतु चव्हाण यांचा सक्रिय सहभाग यथातथाच राहिल्याचे सांगितले जाते. दिंडोरी मतदारसंघातील विधानसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला फायदा करून देण्यापेक्षा अलिप्तताच स्वीकारली. पक्षाने त्यांना अनुसूचित मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, तर त्यांचे चिरंजीव इंद्रजित यांना युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले, परंतु मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वांकाक्षी सीएम चषकसाठी पालकमंत्र्यांनी सूचित करूनही त्यांनी वेळ दिला नाही.तीनवेळा निवडून आल्यानंतर प्रस्थापितांच्या विरोधातील जनमताचा फटका त्यांना बसण्याची शक्यता भाजपाच्या सर्वेक्षणात दिसली. त्यातच आदिवासी विभागातील भरती प्रकरण किंवा सुरगाण्यातील शासकीय समित्यांवर अशासकीय नियुक्ती असो सत्तेच्या विरोधात त्यांनी घेतलेली भूमिकादेखील पक्षाला खटकली होती. त्याचा परिणाम उमेदवारी देताना दिसून आला.भाजपाने केलेल्या सर्वेक्षणात अ‍ॅण्टी इन्कमबन्सीचा फॅक्टर आढळल्याचे सांगितले जाते. तीन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या चव्हाण यांना जनमत अनुकूल नव्हते, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.भारतीय जनता पार्टीच्या संघटना विस्तारात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची तटस्थता कारणीभूत ठरली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाची सत्ता यावी यासाठी पुढाकार घेऊन काम केले नसल्याचे एक कारण सांगितले जाते.पक्षाची सत्ता असताना आदिवासी विभागातील कथित गैरव्यवहाराबाबत चर्चा करून पक्षाला अडचणीत आणण्याची घेतलेली भूमिकाही अडचणीत आणणारी ठरली.काय होऊ शकते?विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणे सोपे असले तरी लोकसभा निवडणुकीत ते शक्य नाही. खुद्द हरिश्चंद्र चव्हाण यांना त्याची जाणीव असल्याने ते नाराज असले तरी बंडखोरी करण्याची शक्यता कमी आहे. परंतु निवडणुकीत ते तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता आहे. अनेक पक्ष निमंत्रित करीत असल्याचा त्यांचा दावा असला तरी निवडणूक लढविण्याची शक्यता नाही.खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडणूक लढविणार नसले तरी निवडणूक आपल्याभोवती फिरवण्याचा प्रयत्न करतील. आपली भूमिका निर्णायक असल्याचे वातावरण निर्माण करतील. पक्षाने उमेदवारी दिली नसल्याचे सांगून सहानुभूती मिळवतील.

टॅग्स :Harishchandra Chavanहरिश्चंद्र चव्हाणElectionनिवडणूकBJPभाजपा