शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

स्थायीच्या सदस्य नियुक्तीबाबत उद्या उच्च न्यायालयात सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 02:28 IST

भाजपचे संख्याबळ दोनने कमी झाल्याने आता स्थायी समितीच्या सदस्यपदी पक्षीय तौलनिक बळानुसार शिवसेनेला लाभ होऊ शकतो. या गेल्या वर्षी दाखल झालेल्या उच्च न्यायालयातील याचिकेवर बुधवारी (दि. १३) अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे भाजपचा जीव टांगणीला लागला आहे. 

ठळक मुद्देभाजपच्या अडचणीत वाढ : प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

नाशिक : भाजपचे संख्याबळ दोनने कमी झाल्याने आता स्थायी समितीच्या सदस्यपदी पक्षीय तौलनिक बळानुसार शिवसेनेला लाभ होऊ शकतो. या गेल्या वर्षी दाखल झालेल्या उच्च न्यायालयातील याचिकेवर बुधवारी (दि. १३) अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे भाजपचा जीव टांगणीला लागला आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे ६६ नगरसेवक निवडून आले होते. मात्र पंचवटीत प्रभाग क्रमांक चारमधील या पक्षाच्या नगरसेविका शांताबाई हिरे यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे. तर त्यापूर्वी भाजपाच्याच नगरसेविका असलेल्या सरोज आहिरे यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पवार निवडून आल्याने भाजपाचे संख्याबळ आणि त्यामुळे पक्षीय तौलनिक बळ कमी झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे अपूर्णांकातील बळ वाढले असून स्थायी समितीची सोळा सदस्यांची रचना बघितली तर या पक्षाचा एक सदस्य वाढू शकतो. तसे झाल्यास स्थायी समितीत भाजपा आणि विरोधकांचे आठ-आठ असे संख्याबळ होते. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने गेल्या वर्षी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याच सुनावणीदरम्यान कोरोनाचे संकट आल्यानंतरदेखील उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले नाही. परंतु निवडणुका घेण्यास संमती दिली. त्यातून भाजपचे गणेश गीते हेच निवडून आले. आता त्यांची कारकीर्द संपत असताना आता पुन्हा या विषयाने उचल घेतली आहे. येत्या बुधवारी (दि. १३) या याचिकेवर अंतिम सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयात होणाऱ्या  या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.आर्थिक सत्ता अडचणीत येण्याची शक्यताया याचिकेत प्रतिवादी असललेल्या महाराष्ट्र शासन, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त आणि नगरसचिव यांना उच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर त्यावर अंतिम सुनावणी होणार आहे. भाजपचे पक्षीय तौलनिक संख्याबळ घटल्यास स्थायी समितीवरील अखेरच्या वर्षातील सत्ता धोक्यात येेण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत. काय अडचण आहे?यापूर्वी हा वाद विभागीय आयुक्तांकडे गेला होता. विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी होत असल्याने शिवसेनेने आधी त्यांच्याकडे धाव घेतली हेाती. त्यानंतर महापौर पीठासन अधिकारी असल्याने त्यांच्याकडेदेखील दाद मागितली हेाती. परंतु त्याचे निराकरण न झाल्याने अखेरीस शिवसेनेचे अजय बोरस्ते आणि विलास शिंदे यांनी उच्च न्यायालयाच दाद मागितली होती. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCourtन्यायालय