शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
6
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
7
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
8
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
9
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
10
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
11
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
12
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
13
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
14
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
15
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
16
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
18
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
19
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
20
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

सुरगाण्यात अतिवृष्टी; बुडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 12:50 AM

नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात आगमन झाले असून, पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरगाण्यात शनिवारी सकाळी अतिवृष्टी होऊन नदी-नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील मोहपाडा येथील भिसोंडी नदीच्या पाण्यात मोतीराम सखा धूम (४५) या शेतकºयाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. याच नदीतून मार्गक्रमण करणाºया दोघा वाहनचालकांना गावकºयांनी पाण्याबाहेर काढले आहे.

ठळक मुद्देदोघा वाहनचालकांना गावकºयांनी पाण्याबाहेर काढले

नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात आगमन झाले असून, पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरगाण्यात शनिवारी सकाळी अतिवृष्टी होऊन नदी-नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील मोहपाडा येथील भिसोंडी नदीच्या पाण्यात मोतीराम सखा धूम (४५) या शेतकºयाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. याच नदीतून मार्गक्रमण करणाºया दोघा वाहनचालकांना गावकºयांनी पाण्याबाहेर काढले आहे.शनिवारी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेच्या दरम्यान सुरगाणा तालुक्यात सरासरी १४१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जणूकाही ढगफुटी झाल्याच्या आविर्भावात धो धो कोसळलेल्या पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, दुपारी मोहपाडा- खुंटविहीर या रस्त्यावरील भिसोंडी नदीला पूर आल्याने या नदीचा पूल पार करून किराणा सामान घेण्यासाठी घराबाहेर पडलेले मोतीराम सखा धूम (४५) हे पुलावरून जात असताना अचानक पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. त्यांच्या पाठोपाठ दोघे दुचाकीस्वार पूल पार करीत असताना त्यांनाही दुचाकीसह पाण्याने ओढून नेले. सदरची बाब गावकºयांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने पाण्यात उड्या घेऊन दोघांना वाचविले, परंतु मोतीराम धूम हे पाण्याच्या प्रवाहात दूर वाहून गेल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. काही वेळाने त्यांचा मृतदेह पाचशे मीटर अंतरावर सापडला.जिल्ह्णात शनिवारी पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. विशेष करून पेठ, दिंडोरी, सुरगाणा व कळवण तालुक्याला पावसाने झोडपून काढले. दिंडोरी तालुक्यातील ननाशी, कोशिंबे, वणी परिसरातही तुफान पाऊस झाला. चांदवड, देवळा, बागलाण तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.तलावात बुडून मृत्यूनिफाड तालुुक्यातील गोरठाण येथे शेळीपालन करणारे उमाकांत सुकदेव मोरे हा ६६ वर्षीय इसम साठवण तलावात बुडून मरण पावला आहे. शुक्रवारी मोरे हे दुपारी एक वाजता दगू मुरलीधर ढोमसे यांच्या गट नंबर १०६ मध्ये शेळ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी तलावात तोल गेल्याने ते बुडून मरण पावले.