शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

"गृहमंत्री कुणाच्या घरापर्यंत लक्ष ठेवू शकत नाहीत", छगन भुजबळांकडून देवेंद्र फडणवीसांची पाठराखण

By धनंजय रिसोडकर | Updated: February 9, 2024 16:56 IST

नाशिकमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना भुजबळ यांनी हे नमूद केले.

नाशिक : सध्या फारच भयंकर प्रकार घडत असून डोकेच चक्रावून जाते. कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर नाही तेच समजेनासे होऊ लागते. कुणीही खिशातून पिस्तूल काढते, गोळ्या चालवते. किती हे दुर्दैव आहे; पण पोलिस किंवा गृहमंत्री काही कुणाच्या घरापर्यंत लक्ष घालू शकत नाहीत, अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एकप्रकारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली.

नाशिकमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना भुजबळ यांनी हे नमूद केले. पोलिस हे चोऱ्या-माऱ्या, दंगल, गँगवॉर, दहशतवादाच्या घटनांमध्ये लक्ष घालून त्यावर नियंत्रण आणू शकतात. किंवा कुणी सुरक्षा मागितली असल्यास त्याला सुरक्षा देतात. मात्र, या घोसाळकर प्रकरणात दोघे मित्र होते, तर उल्हासनगरच्या घटनेतील गायकवाड हे दोघेही एकमेकांचे भाऊबंद होते. अशी आपापसात काही भांडणे असल्यास त्यात पोलिस किंवा अन्य कुणालाही काही कल्पना नसते, असेही भुजबळ यांनी नमूद केले. 

वेगवेगळ्या पक्षात असले तरी एकमेकांचे नातेवाईक आणि त्यात भाऊबंदकी असल्यास त्या सर्व बाबी पोलिस तपासाचा भाग आहेत. तुमच्याबरोबर वावरणारी माणसे अचानकपणे असे प्रकार करत असतील तर ते दुर्दैवच आहे. मात्र, हे प्रकार पाहता लायसन्सबाबतचे नियम अधिक कठोर करायला हवेत, असे वाटते. वाईट धंदे असणाऱ्यांना परवाने देऊ नयेत किंवा शस्त्र दिलेली असल्यास ती काढून घेण्याची आवश्यकता आहे. हा मॉरीस तर जेलमध्ये जाऊन आलेला होता, तर त्याला परवाना कसा मिळतो, तेदेखील बघायला हवे, असेही भुजबळ यांनी नमूद केले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळ