शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

झोपडपट्टीतील रहिवाशांची घरकुले भाडेतत्त्वावर

By admin | Published: August 05, 2016 1:34 AM

भारतनगर : झोपडपट्टीमुक्त योजनेस खोडा

इंदिरानगर : शहर झोपडपट्टीमुक्त होण्यासाठी लाभार्थ्यांना घरकुल योजनेंतर्गत घरकुले देण्यात आली. परंतु भारतनगर व चेतनानगरलगत असलेल्या घरकुल योजनेतील काही लाभार्थ्यांनी घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत. ते पुन्हा झोपडीमध्येच राहण्यास आल्याने शहर झोपडपट्टीमुक्त होण्यास खोडा बसणार आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी शिवाजीवाडी, भारतनगर, नंदिनीनगरसह परिसरातील वसाहतींमध्ये महापालिकेच्या वतीने घरकुल योजनेत बसणाऱ्या लाभार्थ्यांच्या झोपड्यांची पाहणी केली. त्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे जमाही करण्यात आली होती. त्याप्रमाणे गेल्या वर्षात दोन टप्प्यात भारतनगरलगतच्या घरकुल योजनेतील घरांचे सोडत पद्धतीने क्रमांक काढून घरे वाटप करण्यात आली होती. तसेच भगतसिंग वसाहतीमध्ये दोन वर्षांपूर्वी मनपाच्या वतीने लाभार्थ्यांची पाहणी करून यादी तयार करण्यात आली होती. त्यानुसार चेतनानगरलगत असलेल्या घरकुल योजनेतील घरे वाटप करण्यात आली. परंतु भारतनगर आणि चेतनानगरलगतच्या घरकुल योजनेतील काही लाभार्थ्यांनी सुमारे एक ते दोन महिने मनपाच्या वतीने घरात मालक राहता का नाही, याची तपासणी केली असता काही घरे सुमारे १५०० रुपये भाडेतत्त्वावर दिली असल्याचे आढळले. स्वत: मात्र पुन्हा झोपड्यांमध्ये पूर्वीच्या जागेवर राहात असल्याचे आढळून आले. त्यामुळे शासन व मनपाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून शहर झोेपडपट्टीमुक्त करण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)