शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

चार महिन्यांत ११ हजार घरकुले कशी बांधणार

By admin | Published: November 13, 2016 12:52 AM

जिल्हा परिषदेपुढे पेच : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस?

नाशिक : जिल्हा परिषदेला पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात थोडेथोडके नव्हे तर तब्बल ११ हजार ७५१ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. नोव्हेंबर सुरू होऊन एकाही घरकुलाचा ‘पाया’ रचला न गेल्याने विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची चर्चा आहे.विभागीय आयुक्तांच्या कारणे दाखवा नोटिसीच्या ‘बूस्टर डोस’ नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसह सर्वच गटविकास अधिकाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेला गती देण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे तर यापूर्वीच जिल्ह्णातील सर्व शाखा अभियंता व उपअभियंता यांना आलटून-पालटून तालुक्यांमध्ये सर्वेक्षण व लाभार्थी तपासणीचे कामही दिले होते. ते सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, लाभार्थींची यादीही अंतिम करण्यात आल्याची चर्चा आहे.जिल्ह्णात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ११ हजार ७५१ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात देण्यात आलेले आहे. या योजनेत पात्र लाभार्थींची निवड ही सामाजिक, आर्थिक आरक्षणाच्या यादीतून करण्यात येणार आहे. या ११ हजार ७५१ लाभार्थींपैकी सर्वाधिक लाभार्थी दिंडोरी तालुक्यात १२६७ तर सर्वात कमी लाभार्थी देवळा तालुक्यात ३७६ असल्याचे समजते. त्याखालोखाल कळवण ११४२, सुरगाणा १०७६ तसेच निफाड ४६७ व येवला ५०२ असल्याचे कळते. त्यातही अनूसूचित जमाती संवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी मिळत नसल्यानेच उद्दिष्टपूर्ती होत नसल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. मार्च २०१७ अखेर म्हणजेच चार महिन्यांत ही घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात असले तरी घरकुले बांधण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)