शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उमेदवारी नाकारल्यास विचारणार जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 01:25 IST

गेल्यावेळी राष्टवादी कॉँग्रेसच्या ज्या उमेदवाराला भाजपाने अडीच लाख मतांनी पराभूत केले त्या डॉ. भारती पवार यांनी नुकताच मुंबई येथे भाजपात प्रवेश केला असून, त्यामुळे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक : गेल्यावेळी राष्टवादी कॉँग्रेसच्या ज्या उमेदवाराला भाजपाने अडीच लाख मतांनी पराभूत केले त्या डॉ. भारती पवार यांनी नुकताच मुंबई येथे भाजपात प्रवेश केला असून, त्यामुळे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांना उमेदवारी दिली तर तो माझ्यावर अन्यायच ठरेल अशी भावना व्यक्त करणाऱ्या चव्हाण यांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठीे पक्षाचा मेळावाही आयोजिला आहे.खासदारकीची हॅट््ट्रिक करणाऱ्या चव्हाण यांना सहजासहजी उमेदवारी मिळणार नाही अशी भाजपात चर्चा होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांनी भारती पवार यांचा दोन लाख ४७ हजार मतांनी पराभव केला होता. आताही त्या राष्टÑवादीच्या संभाव्य उमेदवार मानल्या जात होत्या. परंतु शिवसेनेतून राष्टÑवादीत दाखल झालेल्या धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर भारती पवार यांची आशा संपुष्टात आली. त्यानंतर त्या भाजपात दाखल झाल्या. परिणामी खासदार हरिश्चंद्र चव्हाण उमेदवारीसाठी वेटिंगवर आहेत. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २२) दुपारी चव्हाण यांच्या नाशिकमधील निवासस्थानी समर्थकांची तातडीची बैठक घेण्यात आली. यात चव्हाण यांना डावलून भारती पवार यांना प्रवेश देण्यात आल्याने संघटनेवरच तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पक्षाशी संबंधित नसलेल्यांना अशाप्रकारे पक्षात स्थान देणे गैर आहे, असे सांगतानाच यावेळी मतदारसंघातील समर्थकांची बैठक घेऊन भूमिका निश्चित करण्याचे ठरविण्यात आले.दरम्यान, भारती पवार यांच्या प्रवेशाचे स्वागतच, मात्र मला डावलून त्यांना तिकीट मिळाले तर तो माझ्यावर अन्याय ठरेल, असे खासदार चव्हाण यांचे म्हणणे आहे. भारती पवार यांच्या प्रवेशाबाबत मला कुठलीही विचारणा झाली नव्हती असे सांगून आपल्या उमेदवारीबाबत अद्याप दिल्लीत कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही, परंतु पक्ष विचार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गेली पंधरा वर्षे संसदेतील माझे कामकाज पक्षाचे वरिष्ठ नेते बघत आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्या कामगिरीची तुलना करून निर्णय घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.मग तो सर्व्हे कोणता?हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी अडचणीत आणण्याला एक सर्व्हे कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. मग, राष्टवादीला ज्या उमेदवाराच्या विजयाची खात्री नव्हती, तो उमेदवार भाजपाच्या सर्व्हेत यशस्वी कसा ठरला, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकHarishchandra Chavanहरिश्चंद्र चव्हाणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस