शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

हृदयद्रावक! दहावीचा पेपर लिहून घरी आली अन् 'ती' नं आयुष्याचा प्रवास कायमचा संपवला

By अझहर शेख | Updated: March 13, 2024 14:54 IST

सिडको परिसरातील स्वामी विवेकानंदनगर या भागात कुटुंबियांसोबत राहणारी भाग्यश्री सुनील शिलावट (१६) ही विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती.

नरेंद्र दंडगव्हाळ

नाशिक : ‘आई-वडिलांच्या सततच्या भांडणाला कंटाळून आत्महत्या करत आहे...’ अशी चिठ्ठी लिहून दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिडको परिसरात घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दहावीची परिक्षा सुरू असताना दुसरीकडे विद्यार्थिनीने असे टोकाचे पाऊल उचलले. यामुळे घरातील वातावरणाचा मुलांच्या मानसिकतेवर होणारा विपरित परिणाम या घटनेतून समोर आला आहे.

सिडको परिसरातील स्वामी विवेकानंदनगर या भागात कुटुंबियांसोबत राहणारी भाग्यश्री सुनील शिलावट (१६) ही विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मंगळवारी (दि.१२) भाग्यश्री हिने अचानकपणे टोकाचा निर्णय घेत सुसाइड नोट लिहून जीवनप्रवास संपविला. तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी दहावीच्या परीक्षेचा पेपर देऊन भाग्यश्री घरी आली. यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास तीने राहत्या घरातील स्वयंपाक घरात असलेल्या सिलिंग फॅनच्या हुकला दोरी बांधून गळफास घेतला. तिची बहीण काही वेळेनंतर घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आई, वडील हे कामानिमित्त घराबाहेर गेलेले होते.

घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा केला असता पोलिसांनी भाग्यश्री हिच्याकडे चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीमध्ये आई, वडीलांच्या सततच्या भांडणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा मजकुर लिहिलेला आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस हवालदार राऊत हे पुढील तपास करीत आहेत.

कौटुंबिक कलह अन् ताणतणावातून अल्पवयीन मुलीने आत्महत्येसारखे पाऊल उचलावे हे तर प्रचंड धक्कादायक आहे. समाजासाठी ही धोक्याची घंटा असून मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नैराश्याची पातळी उच्चस्तरावर गेली की, आत्महत्येचा विचार मनात येतो. वैचारिक शक्ती तेथे खुंटते. समस्येला आता कुठलाही उपाय शिल्लक राहिलेला नाही, असा नकारात्मक विचार मनात येतो अन् त्यातून असे प्रकार घडतात. आपल्या वर्तणूकीचा मुलांवर प्रभाव पडत असतो, हे पालकांनी विसरू नये. - डॉ. मृणाल भारद्वाज, मानसोपचार तज्ञ तथा पोलिस आयुक्तालय समुपदेशन समिती, मुख्य समन्वयक