शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

भैरवगडावरील घटना, पर्यटकांनी पाळापाचोळा पेटविला अन् मधमाशांनी हल्ला चढविला

By अझहर शेख | Updated: April 9, 2024 18:38 IST

जंगलात फिरताना किंवा गड-किल्ल्यांच्या भ्रमंतीवर जाताना तेथील जैवविविधतेला बाधा पोहचेल असे कृत्य टाळणे अत्यावश्यक असते.

अझहर शेख, नाशिक : कुठल्याही जंगलात फिरताना किंवा गड-किल्ल्यांच्या भ्रमंतीवर जाताना तेथील जैवविविधतेला बाधा पोहचेल असे कृत्य टाळणे अत्यावश्यक असते, अन्यथा स्वत:वर संकट ओढावते. कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील कोथळे देवराईमधून भैरवगडावर पोहचलेल्या पुण्याच्या पर्यटकांसाेबत असाच काहीसा प्रसंग घडला. या पर्यटकांनी गडावर पाळापाचोळा काहीसा पेटवून धूर करण्याचा प्रयत्न केला अन् जवळच असलेल्या मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. घटनेची माहिती राजुर वन्यजीव विभागाला मिळताच वनपथकाने मदतीसाठी धाव घेत पर्यटकांना सुरक्षित पायथ्याशी आणले.

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारणामध्ये प्रत्येक ऋुतूत भटकंती करण्याचा वेगळा आनंद असतो. या अभयारण्यात विविध गड-किल्ले, गर्द वृक्षराजी असून ट्रेकर्स, निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमींना ती नेहमीच खुणावते. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, राजुर वनपरिक्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यावर नाशिक वन्यजीव विभागाचे नियंत्रण आहे. 

राज्यप्राणी शेकरूच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेल्या राजुर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोथळे देवराई ही तेथील स्थानिक लोकांनी राखलेले उत्तम जंगल आहे. या जंगलात भटकंती साठी रविवारी (दि.७) पुण्याचे दहा ते बारा पर्यटक आले होते. तेथून ते भैरवगडाच्या दिशेने दुपारी रवाना झाले. काही महिला पर्यटकांनी खालीच थांबणे पसंत केले. सहा ते आठ पर्यटक गडावर पोहचले. त्याठिकाणी त्यांना काही मधमाशा दिसल्या. यामुळे त्यांना पळवून लावण्यासाठी त्यांनी पाळापाचोळा जाळण्याची शक्कल लढविली. ही शक्कल मात्र त्यांच्या चांगलीच अंगलट आली. पाळापाचोळा पेटविताच धूरामुळे असुरक्षिततेची जाणीव मधमाशांना झाली आणि जवळच एका झाडावर असलेल्या पोळावरून मधमाशाचे मोठे मोहोळ उठले आणि पर्यटकांवर हल्ला चढविला. जीवाच्या आकांताने पर्यटक आरडाओरड करू लागले. त्यांच्यापैकी एका पर्यटकाने पुणे येथील ओंकार ओक रेस्क्यु समन्वयक यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. 

ओक यांनी राजुर वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे, भंडारदरा वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांच्याशी संपर्क करून घटना कळविली. माहिती मिळताच पडवळे यांनी वनपरिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक, वनमजुरांचे पथकासह पाण्याच्या बाटल्या, बिस्किटाचे पुडे वगैरे घेऊन भैरवगड गाठले. तातडीने मदतीसाठी १०८रूग्णवाहिकेला पाचारण केले. पथकाने गडावर मधमाशांच्या हल्ल्यात सापडलेल्या सहा पर्यटकांना सुरक्षित खाली आणून राजुर ग्रामिण रूग्णालयात हलविले.

टॅग्स :Nashikनाशिक