शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

चणकापूर-अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 9:46 PM

कळवण : तालुक्यातील आदीवासी पश्चिम पट्यात गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून चणकापूर व पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने हजारो क्यूसेसने पूरपाणी गिरणा व पुनद नदीपात्रात सोडण्यात आल्याने तालुक्यातील पुनंद, गिरणा, बेहडी व तांबडी नद्यांना तसेच म्हशाड नाला खळखळून वाहत आहेत.

ठळक मुद्देकळवण : हजारो क्यूसेसने पाणी विसर्ग; गावांचा संपर्क तुटला; नद्यांना आला पूर

कळवण : तालुक्यातील आदीवासी पश्चिम पट्यात गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून चणकापूर व पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने हजारो क्यूसेसने पूरपाणी गिरणा व पुनद नदीपात्रात सोडण्यात आल्याने तालुक्यातील पुनंद, गिरणा, बेहडी व तांबडी नद्यांना तसेच म्हशाड नाला खळखळून वाहत आहेत.तालुक्यातील नद्यांना पूर आल्याने पाळे खुर्द, एकलहरे, हिंगळवाडी, भादवन, बिजोरे, परिसरातील गावांचा संपर्क तुटला असून पर्यायी व्यवस्था असल्याने पर्यायी मार्गाने ग्रामस्थांनी मार्ग काढला. चणकापूरमधून रात्री ७६३० तर रविवारी दुपारी १७१९१ व चार वाजता १५५९३ क्यूसेसने पाणी विसर्ग होत असल्याने गिरणा नदीकाठच्या गावांना या पूरपाण्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने प्रशासनाने नदीकाढावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.शुक्र वार व शनिवारच्या पावसाच्या सततधार मुळे १६१४ दशलक्ष घनफूट साठा (६६ टक्के) चणकापूर धरणात उपलब्ध झाल्याने रात्री १२ धरणाच्या चार वक्र ाद्वारातून ४३६० क्यूसेस इतक्या प्रवाहाने गिरणा नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात आले होते.शनिवारी सकाळी धरणाच्या सात वक्र ाद्वारे दोन फुटाने उघडून त्याद्वारे ७६३० क्यूसेस पाणी विसर्ग करण्यात आले असून पावसाची सततधार अशीच चालू राहिल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता असून बेहडा व इतर नदी नाले व पुनंद धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने गिरणा नदीपात्र १२००० ते १५००० क्यूसेस प्रवाहाने वाहत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.चणकापूर व पुनंद धरणातून मोठ्या प्रमाणात पूरपाणी सोडण्यात आल्याने, गोसराने, अभोणा, पाळे बु., पाळे खु., बेज, नाकोडे, कळवण, एकलहरे, बगडू, पिळकोस, सुपले दि., काठरे दि., सुळे, पिंपळे खु., पिंपळे बु., देसराणे, नाळीद, मोकभणगी, खेडगाव, ककाणे या नदीकाठावरील गावांना पूरपाण्याचा फटका बसला बसण्याची शक्यता असून शेती व शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील तांबडी, बेहडी नदीला पूर आला असून, तालुक्यातील धनोली, भेगू, ओतूर, नांदुरी, गोबापूर आदींसह लघु पाटबंधारे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरल्याने पूरपाणी नदीपात्रात पाणी विसर्ग होत असल्याने तालुक्यातील नदी नाल्याना पूर आल्याने शेतात पूरपाणी घुसल्याने शेतांचे व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गिरणा, पुनंद, बेहडा, तांबडी नद्यांना आलेला पूर पाहण्यासाठी कळवण, अभोणा, मानूर, जुनीबेज, एकलहरे, गांगवण, बिजोरे, भादवण, दळवट, मोकभणगी, पिळकोस गावातील नागरिकांनी नदीपात्रालगत एकच गर्दी केली होती. चणकापूर प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले असून तालुक्यातील पाझर तलाव, सिमेंट बंधारे १०० टक्के भरली आहेत. येत्या २ ते ३ दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असून धरणातून हजारो क्युसेस पूरपाणी सोडण्यात वाढ केली येणार आहे. कळवण तालुक्यातील छोटी व मोठी लपा प्रकल्प १०० टक्के भरली जाणार असल्याने भविष्यातील शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार असून शेकडो पाझर तलाव व सिमेंट बंधारे पावसामुळे फुल भरल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ होणार आहे.