शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

पदपथवर वाढते अपघात

By admin | Published: November 07, 2016 12:03 AM

अतिक्रमणाने रस्त्यावर चालणे झाले मुश्कीले गायब

 नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्व रस्त्यांना अतिक्रमणाचा वेढा पडला असून, दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात तर सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे. कारण जिकडे पहावे तिकडे टपऱ्या, हातगाड्या, पदपथावरच पथारी पसरून बसलेले विक्रेते यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. सुमारे ५ ते १0 वर्षांच्या काळात शहरातील सर्व मुख्य रस्त्यालगत पेव्हरब्लॉक टाकून तयार करण्यात आलेले पदपथ तर गायबच झाले आहेत.नाशिक शहरातील वाढत्या वाहन व्यवस्थेला, रहदारीला आणि रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना शिस्त लागावी म्हणून मुंबई-पुणे या महानगराच्या धर्तीवर गेल्या दहा वर्षांत शहरातील मुंबई-आग्रा महामार्ग, नाशिक-पुणे महामार्ग त्याचप्रमाणे सिडको-अंबड लिंक रोड, गंगापूररोड, पंचवटी भागातील मुख्य रस्ते, सातपूर औद्योगिक वसाहतीमधील मार्ग, नाशिकरोड, उपनगर आणि इंदिरानगर या मोठ्या वसाहतीतील रस्त्यांचे रूंदीकरण करून मध्यभागी दुभाजक टाकून दोन पदरी रस्ते तयार करण्यात आले. त्या दोन पदरी रस्त्यांच्या लगतच दोन्ही बाजूला सिमेंटचे पेव्हर ब्लॉक टाकून ठरावीक उंचीचे पदपथ तयार करण्यात आले. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक महापालिका आणि राज्य शासनाच्या अन्य विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला. परंतु सदर पदपथांवर सर्वप्रथम छोट्या टपरीधारकांनी आपले बस्तान मांडले. त्याचप्रमाणे लहानमोठे विक्रेतेही हे पदपथ जणू काही आपल्यासाठीच बांधले या थाटात तेथे व्यवसाय करू लागले. मग हळूहळू या सुंदर पदपथांची मोडतोड सुरू झाली. आपल्या छोट्या दुकानाच्या कनातीसाठी पेव्हरब्लॉकमध्ये खिळे ठोकणे, पेव्हरब्लॉकचा कठडा किंवा स्टूलसारखा उपयोग चहा विक्रेत्यांनी सुरू केला. त्यानंतर शहरातील सर्वच रस्त्यालगतचे हे पथपद जणू काही गायबच झालेले दिसतात. आता तर वाहनांच्या गर्दीमुळे रस्त्यावरून पायी चालताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. कारण त्यांच्या एकाकडेला दुकानाची रांग तर दुसरीकडे वेगाने जाणारी वाहने यामुळे अपघातात वाढच होत आहे.