शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

मधुमेह आजाराचे वाढते प्रमाण चिंताजनक

By admin | Published: November 14, 2016 1:26 AM

७० ते ८० टक्के प्रमाण : संतुलित आहार आणि व्यायामाने नियंत्रण शक्य

नामदेव भोर नाशिकडॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधोपचार, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक प्रसन्नता या चतु:सूत्रीच्या आधारे मधुमेहावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यासह आहार तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा असून, संतुलित आहार घेतल्यास ८० ते ९० टक्क्यांपर्यंत नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचे मत आहारतज्ज्ञ व्यक्त करतात. वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि बदलती खाद्यसंस्कृती यामुळे मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, देशातील मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक घरात मधुमेहाचा रुग्ण समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम खाद्यपदार्थांवर होतो. त्यामुळे उघड्यावर उभ्याने खाल्लेल्या पदार्थांचा दुष्परिणाम आरोग्यावर निश्चितच होत असतो. अशा अन्नपदार्थांमधील दोषातून शारीरिक रोग निर्माण होतात. आहारात पथ्ये पाळल्यास उष्णता कमी होते. वेगवेगळ्या वनस्पतींचे मिश्रण केलेली उटणी, आयुर्वेदिक धूप हे मधुमेह नियंत्रणावरील प्रभावी उपाय आहेत. पचन व्यवस्था, हृदयविकार, मूत्रपिंड अशा वेगवेगळ्या संस्थांवर मधुमेहाचा दुष्परिणाम होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. स्त्रियांच्या मानसिकतेचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे मन प्रसन्न ठेवले पाहिजे. आपल्या प्रकृतीनुसार आहार निश्चित करणे आवश्यक आहे, असा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो.