शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

भारत कधीही सहिष्णू नव्हता

By admin | Published: December 15, 2015 11:32 PM

रावसाहेब कसबे : प्रबोधन परिषद

सटाणा : भारत कधीही सहिष्णू नव्हता. या देशात असहिष्णुतेचे वातावरण हे वैदिक काळापासून चालत आलेले आहे. केवळ बौद्ध काळात असहिष्णुता आणण्याचा प्रयत्न झाला; मात्र सहिष्णुता पूर्णपणे प्रस्थापित झाली नसल्याचे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले. समाजप्रबोधन संस्थेतर्फे सोमवारी येथील राधाई मंगल कार्यालयात आयोजित तिसऱ्या एकदिवसीय प्रबोधन परिषदेत ते बोलत होते. या परिषेदेत कसबे यांना कवी यशवंत मनोहर यांच्या हस्ते ‘प्रबोधन मित्र पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी कसबे यांनी नवोदित लेखकांना कोणत्याही व्यक्तीच्या आहारी न जाता स्वत:चे मत व्यक्त करण्याचा संदेश दिला. तसेच स्वत:चे आकलन, निष्कर्ष निर्भीडपणे मांडावे, पर्यावरण आणि त्याची गुंतागुंत जो चांगल्या पद्धतीने समजून घेईल त्यालाच उत्कृष्ट अशी साहित्य निर्मिती करता येईल असा कानमंत्रही त्यांनी नवख्या साहित्यिकांना दिला. समाजप्रबोधन परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी जगातल्या धर्मपीठांनी मानवतेच्या विकसनात हातभार लावण्याऐवजी मोठे विघटन केले असल्याचे परखड मत मांडले. तसेच नव्या जगाचा धर्म ही कविता असेल असा आशावाद व्यक्त करताना डॉ. मनोहर म्हणाले, कसबे हे आंबेडकरी चळवळीतील एक वैचारिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या साहित्याने आणि विचाराने एका पिढीचे प्रबोधन केले असून, त्यांनी अत्यंत खडतर वाटेवर चालत लेखनप्रवास केल्याचेही मनोहर यांनी सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, नाटककार दत्ता पाटील, डॉ. मिलिंद कसबे, बी. जी. वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी कवी किशोर पाठक, महेंद्र मेश्राम, शं. क. कापडणीस, अंबादास घालगोत, प्रशांत गरुड, रंगराज ढेगले, आरती बोराडे, तुषार शिल्लक, प्रमोद अहिरे, संजय दोबाडे, मिलिंद बनसोडे, शैलेश चव्हाण, मेघा पाटील, कचरू भालेराव आदि उपस्थित होते. परिषद आयोजनासाठी दादा खरे, डॉ. सिद्धार्थ जगताप, चंद्रकांत गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)