शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भारतातील युवकांनी सकारात्मक होण्याची गरज; युवा राजदूत अभिजीत दिघावकर याचे मत

By धनंजय रिसोडकर | Updated: August 10, 2019 22:49 IST

नाशिक- जगभरातील युवकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, सक्रीयपणे समाजासाठी योगदान देण्याची उर्जा निर्माण व्हावी. तसेच युवकांना योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीण विकास साधला जावा, या उद्देशाने १२ आॅगस्टला आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. सोमवारी (दि. १२) असलेल्या आंतरराष्टÑीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर आंतराष्टÑीय युवा परिषदेतील भारताचा युवा राजदूत अभिजीत दिघावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आजच्या युवकांकडे सकारात्मक उर्जा आहे. त्यामुळे युवकांनी सकारात्मक बनले पाहीजे असे मत लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देयुवा पिढीला सक्षम करण्याची गरजयुवकांना सर्वच क्षेत्रात समान संधीची आवश्यकता

नाशिक- जगभरातील युवकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, सक्रीयपणे समाजासाठी योगदान देण्याची उर्जा निर्माण व्हावी. तसेच युवकांना योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीण विकास साधला जावा, या उद्देशाने १२ आॅगस्टला आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. सोमवारी (दि. १२) असलेल्या आंतरराष्टÑीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर आंतराष्टÑीय युवा परिषदेतील भारताचा युवा राजदूत अभिजीत दिघावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आजच्या युवकांकडे सकारात्मक उर्जा आहे. त्यामुळे युवकांनी सकारात्मक बनले पाहीजे असे मत लोकमतशी बोलताना व्यक्त केले.प्रश्न : आंतरराष्टÑीय युवा दिनाच्या महत्व काय?दिघावकर : १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) आमसभेत एक ठराव पारित होऊन १२ आॅगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून पाळण्यात येण्याचे ठरले आणि त्यानंतर २००० सालापासून दरवर्षी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. सर्वांना समान संधी उपलब्ध करून देऊन युवा पिढीला सक्षम करणे, शांत आणि समृद्ध समाज निर्माण करणे, त्या माध्यमातून सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधणे हेच या आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या आयोजनाचे ध्येय आहे.प्रश्न : देशाला विकसित राष्टÑ करण्यासाठी भारतीय युवकांना कोणत्या प्रकारच्या संधी मिळायला हव्या असे तुम्हाला वाटते ?दिघावकर : भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे ६० टक्के लोकसंख्या ३५ वर्षांच्या आतील आहे. युवकांची हीच प्रचंड संख्या भारतासारख्या विकसनशील देशाला विकिसत राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसविण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. राष्ट्रांचा विकास हा तरु णाईचा कल्पकतेने, कुशलतेने आणि सकारात्मकपणे वापर करूनच आजपर्यंत झालेला आहे. परंतु भारताला या मनुष्यबळाचा फायदा करून घेण्यासाठी युवकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, तसेच आर्थिक, सामाजिक, आणि राजकीय क्षेत्रामध्ये समान संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.प्रश्न : तुम्ही युवकांसाठी कोणत्या प्रकारचे सामाजिक उपक्रम करता ?दिघावकर : आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्र, अतिदुर्गम भागातील पाड्यांवर जाऊन शिक्षणाबाबत प्रबोधन, स्वच्छतेबाबत जनजागृती, पर्यावरण संवर्धनात त्यांचा सहभाग वाढवणे, मुलींची लग्न अठराव्या वर्षानंतरच करण्यामागील कारणांचा प्रसार, पुरुष-महिला समानता, जनसंख्या नियंत्रणात राखण्याबाबत प्रबोधन तसेच युवावर्गासाठी आणि गोरगरीब शेतकरी व महिलांसाठी उपयुक्त असलेल्या शासकीय योजनांची माहिती देणे,ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये जाऊन युवक-युवतींशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण अशा प्रकारे आमच्या जाणीव या संस्थेच्या माध्यमातून कार्य केले जात असून त्याला युवा वर्गाकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो.प्रश्न : भारतातील युवा पिढी विषयी काय मत आहे?दिघावकर: वाढत्या युवा संख्येमुळे विविध समस्यांनाही भारताला तोंड द्यावे लागणार आहे. बेरोजगारी आणि त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीकडे कल वाढणे, सोशल मीडियाचा अतिवापर, युवकांमधील वाढतं नैराश्य आणि असंतोष, यांसारख्या विविध समस्यांना वेळीच पायबंद घालत युवापिढीला सकारात्मक बनण्याची गरज आहे.मुलाखत: धनंजय रिसोडकर

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिकInternationalआंतरराष्ट्रीय