शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:20 IST

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा, खेडगाव, बोपेगाव, शिंदवड, सोनजांब, जऊळकेवणी परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह दोन तास मुसळधार पाऊस झाला. द्राक्ष, सोयाबीन, मका, टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आमदार नरहरी झिरवाळ, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, निवासी नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधङे, मंङळ अधिकारी साळी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक आदींनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.

ठळक मुद्देखेडगाव परिसर : शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा, खेडगाव, बोपेगाव, शिंदवड, सोनजांब, जऊळकेवणी परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह दोन तास मुसळधार पाऊस झाला. द्राक्ष, सोयाबीन, मका, टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आमदार नरहरी झिरवाळ, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, निवासी नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधङे, मंङळ अधिकारी साळी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक आदींनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.तालुक्यातील पूर्व भागात सुरुवातीला अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाव कोरडेठाक होऊन विहिरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी घट झाली आहे. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत तालुक्यातील शेतकºयांचे नगदी पीक असलेल्या द्राक्षबागांना पोटच्या पोरासारखे विविध रोगराईपासून सांभाळत असताना अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, उत्पादनात मोठा फटका बसला आहे. द्राक्षबागांचा छाटणी हंगाम अखेरच्या टप्प्यात असताना अर्ली छाटणी झालेल्या द्राक्षबागा फुलोरा अवस्थेत आहेत.पावसामुळे फळकुज होऊन फक्त देठच शिल्लक राहिले आहेत, तर पोगा अवस्थेत असलेल्या द्राक्षाच्या बागेमध्ये घड जिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बहुतांश बागांचे नुकसानबहुतांश द्राक्षबागांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकºयांची तारांबळ उडाली असून, मोठे नैसर्गिक संकट उभे राहिले आहे. शेतकºयांनी महागड्या औषधांची फवारणी करून द्राक्षबागा विविध रोगांपासून वाचविल्या; परंतु दोन तासात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकºयांच्या द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या असून, नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे करु न शेतकºयांना त्वरीत नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.