शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

इंटरनेट बँकिंगचा वापर वाढला

By admin | Published: November 14, 2016 1:49 AM

ई-प्रणाली आत्मसात करण्याकडे कल

नाशिक : गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपये चलनातून बाद केल्यानंतर देशासह शहरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आपल्या जवळ असणारे पैसे खात्यात जमा करण्यासाठी तसेच दैनंदिन वापरासाठी पैसे जवळ बाळगण्यासाठी नागरिकांनी शहरातील विविध बँकांबाहेर गर्दी केल्याचे चित्र आहे.बँकेत आपल्या जवळील पैसे नवीन चलानाप्रमाणे बदलून मिळत असले तरी सुट्या पैशांअभावी मात्र नागरिकांची कुचंबणा होत आहे. ऐन वेतन मिळण्याच्या दिवसातच हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने कामगार वर्गामध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. किराणा दुकानदार, दूधवाला तसेच इतर दैनंदिन खर्चासाठी पैसे काढण्यासाठी नागरिकांनी एटीएम केंद्र तसेच बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक मोबाइलचे रिचार्ज, वीज बिलाचा भरणा, टीव्हीचे रिचार्ज, टेलिफोन बिल भरण्यासाठी नागरिकांची मोठी कसरत होत असतानाच अनेक ग्राहकांनी सुट्या पैशांअभावी इंटरनेटद्वारे भरणा करण्यास प्राधान्य दिले तर काही नागरिकांना मात्र यानिमित्ताने इंटरनेट बँकिंग किती आवश्यक आहे, हे अधोरेखित झाले.बाजारपेठेत सुटे पैसेच उपलब्ध होत नसल्याने अनेक दुकानदारही सुटे पैसे देण्यासाठी असमर्थ ठरत आहेत. या जाचाला कंटाळून अनेक मोबाइल ग्राहकांनी इंटरनेट बँकिंगद्वारे तसेच डेबिट कार्ड - के्रडीट कार्डचा वापर करून रखडलेले मोबाइल बिल भरले तसेच आपले मोबाइल रिचार्ज केले. वीज बिल भरणा किंवा मोबाइल बिल भरणाप्रमाणे अनेक पेट्रोलपंपांवरही डेबिट किंवा क्रेडीट कार्ड स्वॅप करून पेट्रोल भरणा करण्यात येत होता. शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदी करण्यासाठी आलेला ग्राहक वर्गालादेखील सुट्या पैशांच्या अभूतपूर्व चणचणीमुळे ज्या दुकानांमध्ये बँकेचे कार्ड व्यवहारासाठी स्वीकारले जात होते अशा दुकानांमध्ये खरेदी करावी लागत होती. ई-व्यवहाराचे महत्त्व अधोरेखित होऊ लागले आहे आणि यामुळेच भविष्यात ‘कॅश लेस’ व्यवहार करणेदेखील सोयीचे होणार आहे. (प्रतिनिधी)