शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
2
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
3
सर्व विक्रम उद्ध्वस्त करत सोनं 81000 हजार पार; GST सह चांदी 102125 रुपयांवर, पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
अजित पवारांनी पहिल्या यादीत नवाब मलिकांचे नाव टाळले? भाजपचा विरोध की अन्य कारण...
5
Corona Virus : कोरोनातून बरं झालेल्या लोकांना हार्ट अटॅक, स्ट्रोकचा दुप्पट धोका?; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा
6
कागलचा 'श्रावणबाळ' पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, हसन मुश्रीफ यांना उमेदवारी
7
NCP Vidhan Sabha Candidate List : काँग्रेसनं नाकारलं, अजित पवारांनी स्वीकारलं! ते दोन विद्ममान आमदार कोण?
8
Ajit Pawar: राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार, ३८ नावांची घोषणा!
9
Airtel Sunil Mittal Birthday : एकेकाळी बनवायचे सायकलचे पार्ट्स, अशी उभी केली Airtel; कसा होत सुनील मित्तल यांचा प्रवास
10
PAK vs ENG FINAL : रावळपिंडी कसोटीसाठी पाकिस्तानने अवलंबवला भारताचा फॉर्म्युला; इंग्लंडची कोंडी!
11
उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?
12
“अंतरवाली सराटी श्रद्धास्थान, बीडमधील सर्व जागा निवडून आणू”; बजरंग सोनावणे जरांगेंना भेटले
13
"...अन् शाहरुखने दिले ५५० रुपये", अमेय वाघने सांगितला किस्सा; किंग खानसमोरच रडला
14
"आपलं काम केलं नाही तर आपणही त्यांचं काम करायचं नाही’’, शिंदेंच्या उमेदवाराचा भाजपाला इशारा
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...
16
लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर राहुल गांधी आणि ओवैसी, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
17
Adani News : अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये घसरण; SEBI नं दिली कारणे दाखवा नोटीस, तुमच्याकडे आहे का?
18
Kalashtami: दर महिन्यात कालाष्टमीला काळभैरवाची पूजा करा, वास्तू दोष दूर सारा!
19
Diwali Astro 2024: दिवाळीत 'या' राशींना आहे राजयोगाची संधी; सोनेखरेदी करताना वाचा नियम!
20
Amit Thackeray - महायुतीकडून परतफेडीचा प्रश्न ते विकासाचा मुद्दा; उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंची रोखठोक उत्तरं

‘नियोजन’च्या बैठकीत आंदोलकांची घुसखोरी

By admin | Published: November 22, 2015 12:13 AM

पोलीस बळाचा वापर : पाणीप्रश्नाभोवतीच सदस्यांची चर्चा, गोंधळामुळे आला अनेकदा व्यत्यय

नाशिक : पाण्याच्या प्रश्नावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलेली घुसखोरी, त्यांना हुसकवण्यासाठी पोलीस बळाचा करावा लागलेला वापर व बैठकीसाठी जमलेल्या सदस्यांनी फक्त पाणी प्रश्नावरच केलेल्या चर्चेत जिल्हा नियोजन समितीचा पुढच्या वर्षाच्या ८७३ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीची बैठक दुपारी एक ऐवजी अडीच वाजता सुरू होताच, पालकमंत्री व त्यांच्या समवेत सभागृहात आलेल्या लोकप्रतिनिधींसोबत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनीही थेट बैठकीत घुसखोरी केली. हातात काळे झेंडे घेत घुसलेल्या या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करताच, प्रवेशद्वारावरच रेटारेटी व झोंबाझोंबी झाली. सभागृहात आंदोलनकर्त्यांची घोषणाबाजी सुरू करताच, वातावरण तप्त झाले. शासकीय अधिकाऱ्यांनी वारंवार विनंत्या करूनही आंदोलनकर्ते बाहेर निघत नसल्याचे पाहून अखेर पालकमंत्री गिरीश महाजन यांनीच ध्वनिक्षेपकाचा ताबा घेत, सभागृहातून बाहेर पडा अन्यथा पोलिसांच्या मदतीने बाहेर फेकू असा इशारा दिला, तरीही आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनाच सभागृहात पाचारण करावे लागले व त्यांनी अक्षरश: आंदोलनकर्त्यांच्या मुसक्या आवळत त्यांना बाहेर काढले. जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यावर पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करू असे आश्वासन पालकमंत्री महाजन यांनी दिले, परंतु त्यावर समाधान न झालेल्या आंदोलनकर्त्यांनी सभागृहाच्या बाहेरच ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, बाहेर आंदोलनकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच असल्याने सभागृहातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची अस्वस्थता क्षणाक्षणाला वाढली, पोलिसांनी आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न करूनही त्यात यश आले नाही. अखेर या गदारोळात बैठक सुरू होताच, आमदार नरहरी झिरवाळ, जि.प. सदस्य शैलेश सूर्यवंशी यांनी जलयुक्त शिवाराच्या कामाचा मुद्दा उपस्थित करून जिल्हा नियोजन समितीचा निधी फक्त जलयुक्त शिवाराच्या कामासाठीच वापर केला जात असल्याने अन्य कामे होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे आमदार विकास निधी सिंचनाच्या अन्य कामांसाठीही वापरण्याची मुभा मिळावी त्याचबरोबर जलयुक्तच्या कामांसाठी गावांची संख्या वाढवावी अशी मागणी केली. त्याच्या या मागणीशी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री चुंभळे यांनीही सहमती दर्शविली व बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठीही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. आमदार जिवा पांडू गावित यांनी जिल्ह्यातील पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविल्यास पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही असे सांगितले. आमदार निर्मला गावित यांनीही इगतपुरी तालुक्यात छोटे-छोटे बंधारे बांधले जावेत जेणेकरून पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल असे सांगितले. (प्रतिनिधी)