शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

कलगीतुरा : विकासकामांच्या स्पर्धेऐवजी उणेदुणे

By admin | Published: January 22, 2015 12:25 AM

आमदार-महापौरांत आरोप-प्रत्यारोप

मालेगाव : येथील मालेगाव मध्यचे आमदार आसिफ शेख व माजी आमदार रशीद शेख हे पिता-पुत्र आणि दुसरीकडे महापौर हाजी मोहंमद इब्राहिंम व उपमहापौर हाजी मोहंमद युनूस ईसा शेख यांच्यात सध्या शहर विकास आराखडा, आरक्षित जमिनींचा विकास व मनपा महासभेतील मंजूर झालेल्या विषयांवरून कलगीतुरा रंगला आहे. मात्र यातून केवळ राजकीय उणेदुण्याचे नाट्य न रंगता त्यातून नेमका शहर विकासास हातभार लागावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.विधानसभा निवडणुका व मनपातील झालेल्या महापौर - उपमहापौर पदांच्या निवडणुकीनंतर शहरातील राजकीय परिस्थिती आणि समीकरणांमध्ये बदल झालेला आहे. काँग्रेसचे निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार आसिफ शेख व माजी आमदार रशीद शेख हे पिता-पुत्र एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल, विद्यमान महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम, उपमहापौर हाजी युनूस ईसा आणि सहकारी पक्ष अशी राजकीय स्थिती आहे. एकीकडे आमदारकी तर दुसरीकडे मनपाची सत्ता अशा परस्परविरोधी गडकिल्ल्यावरून एकमेकांविरोधात राजकीय आरोप- प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मनपाने विकास आराखडा आखताना विविध नागरी सुविधा नागरिकांना पुरविण्यासाठी ज्या जागा आरक्षित केल्या त्या आरक्षणांचा उपयोग होत नसल्याचे आढळून आले आहे. जागा आरक्षित करताना शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वर्दळ कमी व्हावी यासाठी पार्किंग झोनची व्यवस्था व्हावी, टाउन हॉल बांधावा, नवीन अग्निशमन केंद्र व्हावे, झोपडपट्टी भागात व त्यालगत प्राथमिक शाळा व मैदानाची व्यवस्था करावी असा उद्देश होता. मात्र या आरक्षित जागांपैकी काही जागांवर मनपातर्फे व्यापारी संकुलांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यात मनपाच्या आर्थिक फायद्यापेक्षा मनपातील संबंधित राजकीय व पदाधिकाऱ्यांच्या आर्थिक लागेबांध्याचा विचार जास्त असल्याचा आरोप आमदार शेख यांनी केला आहे. अशा प्रकारांमुळे आरक्षित जागांच्या मूळ उद्देशास हरताळ फासला गेला आहे. परिणामी मनपाने विकास आराखडा मंजूर करताना ज्या विविध आरक्षणांवर मंजुरी दिली त्या आरक्षणाप्रमाणे जागेचा उपयोग व्हावा अशी मागणी आमदार शेख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अशा प्रकारच्या मागणीतून आमदार शेख यांनी मनपातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. थेट राज्य शासनाकडे याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसेच दुसरीकडे सर्वसामान्य मालेगावकर जनतेत मनपातील सत्ताधाऱ्यांविरोधात रोष निर्माण होईल अशी व्यवस्था केली. मात्र महापौर व उपमहापौर यांनी याप्रश्नीदेखील ठरावीक भागातीलच आरक्षित जागेचा प्रश्न आमदारानी का उपस्थित केला आहे, असा प्रतिप्रश्न करत परतफेड केली आहे. महासभेत रविवार वॉर्ड भागात झोपडपट्टी भागात दुकानांसाठी लोखंडी कॅबिन उभारण्याचा विषय मंजूर करण्यात आला. त्यास माजी महापौर ताहेरा शेख यांनी केलेला विरोध डावलण्यात आला. शहराला नवीन आमदार आणि नवीन महापौर - उपमहापौर लाभल्यानंतर आता शहराच्या विकासकामांना वाव मिळेल, नवीन दिशा मिळेल, शहराचे प्रश्न - समस्या सुटतील अशी सर्वसामान्य मालेगावकरांची अपेक्षा होती. मात्र या सर्व राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळात शहरातील प्रश्न - समस्या मात्र जैसे थे आहे. (प्रतिनिधी)