शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

औद्योगिक वसाहत वायुप्रदूषणाच्या विळख्यात

By admin | Published: November 12, 2016 12:48 AM

धुलीकणांचे प्रमाण जास्त : संकेतस्थळावर महिन्यापूवीर्ची आक डेवारी

नामदेव भोर नाशिकदेशाची राजधानी नवी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असताना नाशिक शहरातही वेगळी स्थिती नाही. नाशिक शहरात दिल्ली एवढी भीषण परिस्थिती नसली तरी औद्योगिक क्षेत्र वायुप्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालले आहे. परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळ या विषयावर गंभीर नाही. खासगी सूत्रांकडून नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण वाढत असल्याचे सांगितले जात असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या दोन महिन्यांची प्रदूषणाची आकडेवारी संकेतस्थळावर अद्ययावत केलेली नाही.प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या परिसरात धुलीकणांचे प्रमाण अधिक असल्याचे काही दिवसांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतीतील एसपीएम (सस्पेंड पार्टिकुलेट मॅटर- यात १० मायक्रॉन आणि त्यापेक्षा कमी आकाराच्या धुलीकणांसह मोठ्या धुलीकणांचा समावेश होतो) मोठ्या प्रमाणात वाढले असून संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार वातावरणातील एसपीएमच्या घटकांनी प्रदूषण मापनाच्या प्रत्येकवेळी कमाल मर्यादा ओलांडल्याचे दिसून येते. तर रहिवासी परिसरात आॅगस्ट महिन्यातील आकडेवारीनुसार १० मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या धुलीकणांचे म्हणजे श्वसनातून शरीरात पोहोचणाऱ्या हानिकारक घटकांचे प्रमाण वाढले आहे. चालू वर्षी आॅगस्ट महिन्यात १६ वेळा वातावरणातील वायुप्रदूषणाची तपासणी करण्यात आली. यात नऊ वेळा वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये वातावरणातील धुलीकणांचे अर्थात आरएसपीएमचे किमान प्रमाण ८८ एम क्युबपर्यंत पोहोचले असून कमाल प्रमाणाने तब्बल १६१ एमक्युबचा टप्पा गाठला आहे. तर हे प्रमाण जानेवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीत किमान १४ एमक्युबपर्यंत असेले तरी कमाल प्रमाणाने २८० एमक्युबचा निर्देशांक गाठला होता. या वर्षभरात सुमारे ५५ दिवसांत वायुप्रदूषणातील आरएसपीएम प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. तर केवळ सातपूर औद्योगिक वसाहतीच्या भागात वर्षभरात २१ वेळा धुलीकणांनी मर्यादा ओलांडली होती. सोबतच एसपीएमची मर्यादा सातत्याने नियोजित मर्यादेपेक्षा अधिक नोंदवली गेली आहे. तर २०१४ वर्षात २२५ वेळा करण्यात आलेल्या प्रदूषण मापनात तब्बल ३२ वेळा आरएसपीएमचे प्रमाण १०० एमक्युपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये औद्योगिक वसाहतींमध्ये प्रदूषण नियंत्रणात असल्याचे सांगितले जात असले तरी शुक्रवारी (दि.११) नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आरएसपीएम प्रमाणापेक्षा म्हणजेच १०० एमक्युबपेक्षा तब्बल ३१.७९ एवढे अधिक असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरून स्पष्ट होते.याधुलीकणांच्या प्रदूषणांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर गेल्या आॅगस्ट महिन्यांपासून नोंदच होत नसल्याने अधिकाऱ्यांकडून शहरातील प्रदूषणाकडे डोळेझाक होत असल्याचे स्थिती निर्माण झाली आहे.