शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जलसाठा कमी ; तर शहरात एकवेळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 01:07 IST

गंगापूर धरण आता तळ गाठत असून, जलसाठा कमी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात गरज भासल्यास ज्या ठिकाणी दोनवेळ पाणीपुरवठा होत आहे त्याठिकाणी एकवेळच पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी (दि. २२) दिली.

नाशिक : गंगापूर धरण आता तळ गाठत असून, जलसाठा कमी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात गरज भासल्यास ज्या ठिकाणी दोनवेळ पाणीपुरवठा होत आहे त्याठिकाणी एकवेळच पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी (दि. २२) दिली. याठिकाणी चर खोदण्याचे काम सुरू असून, तेदेखील तातडीने पूर्ण करावे तसेच या ठिकाणी असलेला खडकाचा अडथळादेखील आताच काढावा अशाप्रकारची सूचना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.गंगापूर धरणातील जलसाठा कमी होत असून, पाऊसदेखील पडत नसल्याने सध्या शहरावर पाणीकपातीचे संकट घोंगावत आहे. नाशिक शहराला ३० जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी असले तरी पावसाची एकंदरच स्थिती बघता कोणत्याही क्षणी पाणी कपात होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गंगापूर धरणात सध्या असलेले पाणी हे जलविहिरीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्याचे काम सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.२२) पाहणी दौरा केला आणि परिस्थितीची पाहणी केली.गंगापूर धरणात सध्या ९०० दशलक्षघनफूट पाणी शिल्लक असून, त्यातील साडेपाचशे दशलक्षघनफूट पाणी नाशिक महापालिकेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरीसपर्यंत शहराला पाणीपुरवठा होईल अशाप्रकारचे नियोजन आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. ही बाबत लक्षात घेता शहरातील ज्या भागात दोन वेळ पाणीपुरवठा होत आहे, तेथे एकवेळ पाणीपुरवठा करता येईल काय, त्या भागांमध्ये एकवेळच परंतु ज्यादा दाबाने पाणीपुरवठा कसा करता येईल, त्याचे नियोजन करून आठ दिवसांत पाणीपुरवठा विभागाने अहवाल सादर करावा, असे आदेश दिल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली. तर नदीपात्रात चर खोदण्यासंदर्भात आपणच पत्र दिले होते. पाण्याचे सूयोग्य नियोजन केले पाहिजे, असे मत सभागृह नेता दिनकर पाटील यांनी केले. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, मनसे गटनेता सलीम शेख, रिपाइंच्या दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते. तसेच अधीक्षक अभियंता नलावडे, कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण, अविनाश धनाईत आदी उपस्थित होते.शिवसेना तयार, मात्र आपसातच गोंधळशहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पुरेसा साठा नाही तसेच पाऊस कमी झाल्याने पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. शहर हिताचा विचार करता राजकारण न करता सर्वांनी सहकार्याची भूमिका घेण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले. तथापि, गटनेता विलास शिंदे यांनी दौºयाकडे पाठ फिरविली. अगोदरच पाण्याचे नियोजन करण्याची गरज असताना तसे न केल्याने ही वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी धरणात जलपूजन करण्यास महापौरांनी वेळ दिला नाही त्यामुळे आता ही वेळ आली असून, सांगून हा एकप्रकारे गोदामातेचा प्रकोपच असल्याचे नमूद केले.आयुक्तांची दांडी आणि पाटील यांची नाराजीमहापौर रंजना भानसी तसेच अन्य सर्व पदाधिकारी गंगापूर धरणाच्या पाहणी दौºयासाठी गेले असताना आयुक्त राधाकृष्ण गमे मात्र या दौºयात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे सभागृहनेता दिनकर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व पदाधिकारी आले असतानादेखील आयुक्तउपस्थित राहत नाही हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कॉँग्रेस पक्षाचे गटनेते शाहू खैरे तसेच राष्टÑवादी कॉँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, अपक्षांचे गटनेते गुरूमित बग्गा आदिंनीदेखील या दौºयाकडे पाठ फिरविली. महासभेतील त्यांची नाराजी कायम असल्याचे दिसून आले.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी