शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
4
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
5
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
6
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
7
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
8
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
9
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
10
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
11
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
12
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
13
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
15
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
16
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
17
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
18
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
19
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
20
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...

वैतरणा धरणातील जमीन मूळ मालकांना परत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:11 AM

▪️ जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी दिले आदेश. देवगाव : त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात बांधण्यात आलेल्या अपर वैतरणा ...

▪️ जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी दिले आदेश.

देवगाव : त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात बांधण्यात आलेल्या अपर वैतरणा धरणासाठी संपादित जमिनींपैकी वापराविना पडून असलेली ६२३ हेक्टर अतिरिक्त जमीन स्थानिक मूळ मालक असलेल्या व ज्या जमिनी शेतकरी स्वत: कसत आहेत, मात्र त्या जमिनी आजही शासनाकडे संपादित आहेत अशा जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहेत. याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस जलसंपदामंत्री जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

वैतरणा धरणातील विनावापर पडीक असलेल्या जमिनी मूळ मालकांना परत मिळावी यासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे जलसंपदामंत्र्यांनी या बैठकीत महसुली विभागातील व जलसंपदा विभागातील महत्त्वाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देत येत्या दोन महिन्यांत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई येथे मंत्रालयात झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यात प्रामुख्याने इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील धरणांची स्थिती याबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीस प्रामुख्याने जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांनी वैतरणा धरणातील अतिरिक्त जमिनी शेतकऱ्यांना परत देण्यात याव्यात अशा सूचना दिल्याची माहिती खोसकर यांनी दिली.

वैतरणा धरणात संपादित झालेल्या जमिनींपैकी वापरात नसलेल्या आणि स्वत: शेतकरी कसत असलेल्या अतिरिक्त जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्यात अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. अपर वैतरणा धरणाच्या कामासाठी अतिरिक्त एकूण ६२३ हेक्टर जमीन संपादन केलेली आहे. ही जमीन अद्यापही शासनाच्या नावावर आहे. मात्र, ही जमीन स्थानिकांना देण्यात यावी. प्रकल्पग्रस्तांच्या उताऱ्यावर आजही शासनाचे नाव आहे, ते काढून मूळ मालक असलेल्या प्रकल्पग्रस्तांचे नाव लावण्यात यावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत होती. मूळ मालक असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांना स्वमालकीची जमीन पुन्हा त्यांच्या नावावर करण्यात येईल, अशी आशा खोसकर यांनी व्यक्त केली.