शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

खामखेड्यात कांदा लागवड अंतिम टप्प्यात

By admin | Published: December 21, 2016 11:44 PM

मजुरांना सुगीचे दिवस : शेतकऱ्यांची धावपळ सुरू

खामखेडा : परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र मध्यंतरीच्या पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने यावर्षी कांद्याची लागवड उशिराने केली जात आहे.उन्हाळी कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. साधारणत: आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाळी कांदा लागवडीला सुरुवात केली जाते. ती नोव्हेंबर ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होते. कारण पुढे उन्हाच्या कडाक्यामुळे विहिरीचे पाणी कमी-कमी होत जाते. परंतु यावर्षी मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे सुरुवातीच्या काळात टाकलेली उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा कांद्याची बियाणे टाकून रोपे तयार करावी लागल्याने यावर्षी परिसरात कांद्याची लागवड उशिराने केली जात आहे.  पूर्वी बागयती शेती अल्प प्रमाणात असल्याने शेतीच्या कामासाठी अगदी सहजतेने मजूर वर्ग उपलब्ध होत असे. परंतु विज्ञान युगात शेतीचा विकास झाल्याने पूर्वी काम करणारा मजूर शेतकरी झाल्याने आता गावात मजुरांची टंचाई भासू लागली आहे. सध्या रब्बीचा हंगाम असल्याने मजूर मिळणेही मुश्कील झाले आहे.  मजूर मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना वनवन करीत भटकावे लागत आहे. तेव्हा बाहेरगावाहून मजूर आणावे लागत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मजूर आणण्यासाठी व परत सोडण्यासाठी स्वत:ची वाहन व्यवस्था आहे ते बाहेरगावाहून मजूर आणतात. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे वाहन व्यवस्था नाही खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यात पैशाही खर्च होत आहे. रिक्षावाला बाहेरगावी जाऊन मजुरांना शेतात सोडतो व सायंकाळी ५ वाजता त्यांच्या गावी सोडतो. सध्या मजुरांना सुगीचे दिवस आले असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)