शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

पालेभाज्या-फळभाज्या महागल्या

By admin | Published: July 02, 2014 10:06 PM

पालेभाज्या-फळभाज्या महागल्या

 

नाशिक : जून महिन्यात वरुणराजाने उघडीप दिल्यामुळे बळीराजासह सर्वांनाच पावसाची ओढ लागली आहे. पालेभाज्या-फळभाज्या यांच्या उत्पादनासाठी जूनमध्ये आलेला पाऊस पूरक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे; मात्र जून महिना संपला असून जुलै महिना सुरू झाला; मात्र अद्याप शहरासह जिल्ह्यात कोठेही वरुणराजाची कृपादृष्टी झाली नसल्याने शेतमालाची आवक बाजारात घटल्याने पालेभाज्या, फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे.जून महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यांमध्ये पावसाने हजेरी लावणे सर्वांनाच अपेक्षित असते; मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे त्याचा परिणाम धरणामधील जलसाठ्याबरोबर विहिरींच्या पाण्याच्या पातळीवरही परिणाम झाल्याने शेतमालाच्या उत्पादनाची आवकही घटल्याने बाजारात पालेभाज्या, फळभाज्या कडाडल्या असून, सर्वसामान्यांना खरेदी करणे अवघड झाले आहे. शेपू, अंबाडी, चवळी, तांदुळका, पालक, मेथी, कोथिंबीर या सर्वच पालेभाज्यांच्या जुड्या महागल्या आहेत. बाजारात पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनादेखील माल जास्त दराने खरेदी करावा लागत आहे. तसेच पालेभाज्याच्या एका जुडीमध्ये दोन जुड्या तयार करून निम्म्या किमतीमध्ये विक्री करावी लागत आहे. मोठी जुडी महाग असल्यामुळे ग्राहक खरेदी करत नाही. सर्वच पालेभाज्यांची मोठी जुडी १५ ते २० रुपये प्रति जुडीने विक्री होत आहे, तर यामधून निम्मी भाजीची केलेली लहान जुडी दहा रुपयाने किरकोळ बाजारात विक्री होत आहे. याचबरोबर कांदे, बटाटे, वांगे, शेवगा, ढोबळी मिरची, हिरवी मिरचीदेखील महागली आहे. कांदे २० रुपये व बटाटे पंचवीस रुपये किलोने किरकोळ बाजारात विकले जात आहे. (प्रतिनिधी)