शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पक्षाने काढून टाकण्यापेक्षा पदे सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 01:50 IST

पक्षाच्या चिंतन शिबिरात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ज्या पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटना बांधणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे त्यांनी ती योग्य प्रकारे पार पाडावी; अन्यथा पक्षाकडून पदावरून काढून टाकण्याची कारवाई होऊ शकते. त्यामुळे पेलत नसेल तर जबाबदारीतून मुक्त होऊन नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशा शब्दांत जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत प्रदेश पदाधिकाऱ्यांनी स्वकीयांवरच शरसंधान केले. पक्षाकडून लवकरच एक व्यक्ती एक पद तत्त्वाचा अवलंब केला जाणार असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या बैठकीत निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर शरसंधान

नाशिक : पक्षाच्या चिंतन शिबिरात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ज्या पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटना बांधणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे त्यांनी ती योग्य प्रकारे पार पाडावी; अन्यथा पक्षाकडून पदावरून काढून टाकण्याची कारवाई होऊ शकते. त्यामुळे पेलत नसेल तर जबाबदारीतून मुक्त होऊन नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशा शब्दांत जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत प्रदेश पदाधिकाऱ्यांनी स्वकीयांवरच शरसंधान केले. पक्षाकडून लवकरच एक व्यक्ती एक पद तत्त्वाचा अवलंब केला जाणार असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.

नवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणीसाठी नाशिक जिल्हा काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २६) घेण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चिंतन शिबिराचा दाखला देत, जिल्ह्यात पक्ष बांधणी नव्याने करण्याची वेळ आल्याचे सांगितले. अलीकडेच राबविण्यात आलेली डिजिटल सभासद नोंदणी ज्या पद्धतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात करण्यात आली त्याविषयी नाराजी व्यक्त करून पानगव्हाणे यांनी, पदाधिकाऱ्यांकडे पक्ष संघटना बांधणीसाठीच पदे देण्यात आली आहेत. परंतु त्याचा उपयोग होत नसल्याचे दिसून येत असून, पक्षाने पदावरून दूर करण्यापेक्षा प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याचे सांगितले. तर जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी, देशभरात नवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून डिजिटल सभासद नोंदणी, बुथ, ब्लाॅक, जिल्हा, राज्य, देश ह्या संघटनात्मक बांधणीसाठी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लवकरच प्रदेश पातळीवर एका शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, जिल्हा पातळीवरदेखील असे शिबिर घेण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने जिल्ह्यातही पक्ष बांधणीसाठी ७५ किलोमीटर पदयात्रा काढण्यात येणार असून, त्याची तारीख व ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल, असे सांगितले. यावेळी डॉ. शोभा बच्छाव, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर माजी आमदार अनिल आहेर, प्रा. अनिल पाटील, गोपाळ लहामगे, ज्ञानेश्वर काळे, गुणवंत होळकर, बाळासाहेब कुक्कडे, रौफ कोकणी, अल्तमेश शेख, किशोर कदम, किरण जाधव तसेच ॲड. समीर देशमुख, विनायक सांगळे, समाधान पाटील, संजय जाधव, डॉ. राजेंद्र ठाकरे, सुनील आव्हाड, साखरचंद कांकरिया, प्रशांत बाविस्कर, सखाराम भोये, रमेश जाधव, विशाल जाधव, महेंद्र हिरे, दिलीप पाटील, अफजल शेख, भीमराव जेजुरे, वाळू जगताप, मुजाहिद खतिब आदी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन रमेश कहांडोळे यांनी केले.

 

टॅग्स :Nashikनाशिकcongressकाँग्रेस