शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

ग्राहकांची लूट करणाऱ्यांना कायदेशीर सवलत

By admin | Published: August 05, 2015 12:10 AM

ग्राहकांची लूट करणाऱ्यांना कायदेशीर सवलत

नाशिक : १ आॅगस्टपासून महापालिका हद्दीतील एलबीटी म्हणजेच स्थानिक संस्था कर रद्द करण्यात आल्याने तो कर वगळून ग्राहकांना विकल्या जात नाही तर एलबीटीसहीत दर आकारून लूट सुरू आहे. तथापि, यावर शासकीय यंत्रणांचे मौन आहे. तर कंपन्यांनी अधिकृतरीत्या किमान मूल्य कमी केल्याचे जाहीर करीत नाही तोपर्यंत कारवाई करता येत नाही असे वैधमापन विभागाचे म्हणणे असून, ग्राहक संघटनांनी ग्राहकांच्या बाजूने उभे राहून लढण्याऐवजी नागरिकांनाच तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.जकात रद्द झाल्यानंतर राज्यशासनाने त्याला पर्याय म्हणून एलबीटी लागू केला. त्यातून पाच लाख रुपयांपर्यंतची उलाढाल असलेले छोटे व्यावसायिक विक्रेते वगळले. मात्र, अन्य व्यापारी आणि उद्योजकांना मात्र ती कायम होती आता १ आॅगस्टपासून ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्यांना एलबीटीच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे ९९ टक्केव्यापारी - उद्योजक एलबीटीच्या कचाट्यातून सुटले आहेत. नाशिक पुरताच विचार करायचा तर शहरात फक्त ९२ आस्थापनांनाच कर लागू होणार आहे. साहजिकच कोणत्याही वस्तूवर असलेला दोन ते चार टक्के कराचा विचार करता हा कर वगळून वस्तूची विक्री व्हायला हवी. मात्र एलबीटी रद्द होऊन तीन दिवस झाले तरी अद्याप कोणीही त्यानुसार कार्यवाही करण्यास तयार नाही. नागरिकांना कोणतीही वस्तू स्वस्तात मिळत नाही उलट कर रद्द झाला असतानाही करासहित वस्तू विकल्या जात असल्याने नागरिकांकडून बेकायदा लूट सुरू आहे.यासंदर्भात वजन मापे विभागाच्या अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली. ज्या कंपन्यांनी मालावर कमाल किंमत मुद्रित केली आहे. त्यापेक्षा कमी किमतीत विक्री करा, असे विक्रेत्यांना सांगता येणार नाही, असे सांगून लूट करणाऱ्यांना कायदेशीर सवलतच जणू दिली आहे. एलबीटी रद्द झाल्यांनतर संबंधित वस्तूच्या उत्पादक कंपनीने तसे दोन वृत्तपत्रांत जाहिरात देऊन सुधारित किंमत जाहीर करून त्याच दराने वस्तू विकत घेण्याचे आवाहन केले पाहिजे तरच त्यानुसार दर आकारणी न करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करता येईल. तर दुसरीकडे ग्राहक संघटनांनी अशा विक्रेत्यांवर कारवाई करणे सोडून नागरिकांनीच तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)