शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

राजापूर परिसरातील पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 12:00 AM

राजापूर : परिसरात शुक्रवारी (दि.९) संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. खरिपाच्या पेरणीनंतर पावसाचा खंड पडला ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांत समाधान : दुबार पेरणीचे संकट टळले

राजापूर : परिसरात शुक्रवारी (दि.९) संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. खरिपाच्या पेरणीनंतर पावसाचा खंड पडला होता. पिके पाण्यावाचून सुकू लागली असताना वरुणराजाने हजेरी लावल्याने पिके पुन्हा तरारली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.राजापूर व परिसरात उत्तर पूर्व भागात शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशी पेरओल असेल तरच पेरणी करावी अन्यथा पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले होते. परंतु शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसावर पेरण्या उरकल्या होत्या. त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतित होता. पेरणी केली पण काही ठिकाणी कोंभ वर आलेच नव्हते. खरिपात शेतकऱ्यांनी मका, भुईमूग, बाजरी, तूर अशी पिके घेतली आहेत. राजापूर व परिसरात दोन टप्प्यांत पेरण्या झाल्या आहेत. आता काही ठिकाणी मका मोठा झाला आहे तर काही मक्याला आताच कोंब फुटत आहे. आजही विहिरींना पाणी नसल्याने शेतकरी वर्ग लाल कांदा उळे टाकण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पावसाचा खंड पडल्याने पिकांची वाढ काही प्रमाणात खुंटली आहे. त्यात आता लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा औषधे फवारणी केली जात आहे.राजापूर येथे बऱ्याच पेरण्यांमध्ये तीन आठवड्यांचा फरक आहे. अगोदरच्या पिकांची दोनदा कोळपणी झाली आहे. तर नंतर पेरणी केलेली पिके हे आता उतरत आहेत. काही शेतकऱ्यांनी काळपट जमीन असलेल्या शेतात सोयाबीन पेरणी केली, परंतु पुरेशी पेरओलअभावी दुबार पेरणी करावी लागली आहे. अगोदर पेरणी केलेल्या पिकांना आता पाऊस झाल्याने युरिया खताची मात्रा देणे सुरू असून बऱ्याच शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याने त्यांची धावपळ सुरू झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी युरिया खताची टंचाई निर्माण होते की केली जाते याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.विहिरींनी अजूनही तळ गाठलेला आहे. आता थोडाफार प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना या नक्षत्राने जीवदान दिले आहे. येथून मागे दोन दिवसांपूर्वी पिकांची परिस्थिती बिकट झाली होती. सध्या महागाई भरमसाठ वाढली असून, याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शासनाने कर्जमाफी केली असली तरी बरेच शेतकरी वंचित राहिले आहेत; परंतु यात जे शेतकरी थकीत राहतात त्यांना कर्जमाफी दिली जाते. व जे शेतकरी थकीत न राहता कर्ज वेळेवर भरतात त्यांना कर्जमाफी नाही ही शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. दोन लाखांपर्यंत सरसकट कर्ज माफ केले असते तर उर्वरित दोन लाखांवरील शेतकऱ्यांनी भरून दिले असते, अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे.शेतकरी वर्ग हा नेहमी आशावादी राहून शेतीकामात व्यस्त असतो. शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळत नाही. वेळेवर पाऊस नाही अशा अनेक समस्या शेतकऱ्यांच्या जीवनात येतात. तरीही शेतकरी न डगमगता संकटांना सामोरे जातो. शेतकऱ्यांवर पेरणीपासून ते पीक येईपर्यंत अनेक संकटे येतात. शासनाने शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष केंद्रित करावे.- साखरचंद घुगे, शेतकरी, राजापूर 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती