शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

जीवनरक्षकांना भासतेय सुरक्षेची गरज

By admin | Published: July 01, 2017 12:07 AM

नाशिक : डॉक्टर हे आपल्या क्षेत्राच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत असतात. अशावेळी त्यांना त्यांचे कर्तव्य करू देण्याऐवजी त्यांच्यावर हल्ले केले जातात.

नामदेव भोर। लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : डॉक्टर हे आपल्या  क्षेत्राच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत असतात. अशावेळी त्यांना त्यांचे कर्तव्य करू देण्याऐवजी त्यांच्यावर हल्ले केले जातात.  त्यात अनेकदा जीवही गमवावा  लागत असल्याने या जनसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन:पुन्हा ऐरणीवर येत असून, जनमानसाच्या जीवनाची सुरक्षा करणाऱ्या या जीवन रक्षकांनाच आता सुरक्षेची गरज निर्माण झाली आहे.  धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहण म्हामूनकर यांना रु ग्णांच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण केल्याने म्हामूनकर यांचा एक डोळा निकामी झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापतही झाली आहे, तर दुसरीकडे नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केलेला स्वाइन फ्लूचा रुग्ण दगावल्याने त्याच्या संतप्त झालेल्या नातलगांनी कक्षातील इंटर्न डॉक्टर रोहित पाटील व परिचारिका चारु शीला इंगळे यांना धक्काबुक्की करीत मारहाण केल्याचा प्रकार घडला. यानंतर झालेल्या आंदोलनांमुळे सरकारने तत्काळ अनेक निर्णय घेतले. परंतु विषयाची तीव्रता कमी होताच, बरेच निर्णय कागदावरच राहीले.  डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले व मारहाणीच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टर असोसिएशनतर्फे काळ्या फिती लावून निषेध, आंदोलने व मूकमोर्चे काढले जातात आणि रु ग्णांच्या नातलगांकडून होणाऱ्या नाहक मारहाणीबद्दल डॉक्टर मंडळींकडून आक्रोश व्यक्त करण्यात येतो.  डॉक्टरांवर होणारे हल्ले पाहता डॉक्टरांनी गळ्यात बंदुका लटकवून रु ग्णांची तपासणी करावी का असा प्रश्न आता डॉक्टर शासनाला विचारत असून, डॉक्टरांना यापुढे २४ तास संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे.रुग्णांचा विश्वास जिंकण्याची गरज४भारतामध्ये डॉक्टर आणि रु ग्ण यांचे प्रमाण १:१००० एवढे आहे. त्यामुळे डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. डॉक्टरांवरील हल्ल्याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या पाहणीत ७५ टक्के हल्ले  रु ग्णालयात कामावर असताना झाल्याचे आढळून आले आहे. तसेच बहुतेक हल्ले सरकारी रु ग्णालयात झाल्याचेही निदर्शनास आले आहे. पूर्वी डॉक्टर व रु ग्ण यांच्यात विश्वासाचे नाते होते. डॉक्टरांकडून उपचार मिळाल्याबद्दल कृतज्ञतेची भावना होती. मात्र ते आता कमी होत असल्याने डॉक्टरांनीही रुग्णांचा विश्वास जिंकण्याची गरज आहे. स्नेहपूर्ण, पारदर्शी संवाद आवश्यकडॉक्टर नेहमीच रुग्णांना वाचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न करतात. परंतु काही प्रक रणांमध्ये डॉक्टरांनाही मर्यादा येतात. अशावेळी कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. कठोर कायद्याची भीती ही हवीच, पण केवळ कठोर कायद्यामुळेच डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना कमी होतील अशा भ्रमातून सर्वप्रथम बाहेर येऊन त्यावरील अन्य उपाययोजना शोधायला हव्यात. यासाठी सरकार- रु ग्णालयीन प्रशासन-डॉक्टर यांचे परस्परांशी आणि त्यांचे विशेषत:  रु ग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे, परिचारिकांचे आणि कर्मचाऱ्यांचे  रु ग्णांशी व त्यांच्या नातलगांशी आपुलकीचा, स्नेहभावाचा आणि पारदर्शी संवाद होणे आवश्यक आहे. तसेच डॉक्टरांनी अत्यावस्थ रुग्णांना तत्काळ वैद्यकीय साहाय्य करीत रुग्णाच्या प्रकृतीची व उपचारपद्धतीची रुग्णाच्या नातेवाइकांना माहिती देणे गरजेचे आहे. - डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोगतज्ज्ञ