शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

वंचित मुलांसाठी भरतात साक्षरता वर्ग

By admin | Published: July 08, 2017 1:15 AM

नाशिक : कितीही घोषणा दिल्या जात असल्या तरी पैसा, परिस्थिती आदि विविध कारणांमुळे प्रत्येकालाच शिक्षण घेणे शक्य होत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शिकाल तर टिकाल’, ‘ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा’ अशा कितीही घोषणा दिल्या जात असल्या तरी पैसा, परिस्थिती आदि विविध कारणांमुळे प्रत्येकालाच शिक्षण घेणे शक्य होत नाही. अशा शिक्षणाच्या प्रवाहातुन बाजूला पडलेल्यांना पुन्हा एकदा ज्ञानामृत देऊन शिक्षित करणे, स्वत:चे स्थान निर्माण करण्यास मदत करणे हे काम शहरातील सामाजिक संस्था आणि वैयक्तिक स्तरावर अनेकजण करीत आहेत. आज साजऱ्या होणाऱ्या ‘राष्ट्रीय साक्षरता दिनी’ त्यांच्या कार्याचा हा आढावा.दिशा संस्था : आनंदवलीजवळील विश्वास लॉन्स परिसरातील मोकळ्या मैदानावर २००५ पासून सुधा मेहता या गरीब मुलांना ‘दिशा’ अंतर्गत मोफत शिकविण्याचे काम करीत आहेत. पहिली ते दहावीच्या गरीब मुलांची शिकवणी घेतली जात आहे. सुधातार्इंना कल्पना ओहोळ, संगीता देशमुख, रेखा राजभर, स्नेहल कुलकर्णी, सुरेश दीक्षित, बिडवई या शिक्षकांचे बळकट हात लाभले आहेत. आपापली कामे सांभाळून हे शिक्षक मुलांना शिकवित आहेत. स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, जायंट ग्रुपसारख्या सामाजिक संस्था आर्थिक पाळबळ देण्याचे काम करीत आहेत. सेवा संस्था : सोशल एम्पॉवरमेंट फॉर व्हॉलेंटीअरी अ‍ॅक्शन अर्थात सेवा संस्था अनेक वर्षांपासून शहरातील शाळाबाह्य आणि शाळेत जाणाऱ्या, मात्र अभ्यासात कच्च्या असणाऱ्या, पेठरोडवरील अंबिकानगर आणि गंजमाळ जवळील भीमवाडी झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणाचे काम करीत आहे. या संस्थेचे कार्यकर्ते अ‍ॅड. राजपाल शिंदे, दीपक देवरे, राणी जाधव, वैशाली राऊत, विनय कटारे यासाठी कार्यरत आहेत. यावर्षी या झोपडपट्टीतील १३ मुलांना त्यांच्या राहिलेल्या विषयांची तयारी करून घेण्याबरोबर कॉलेजच्या अ‍ॅडमिशनचेही काम करवून घेण्यात आले आहे. युवान ग्रुप : वेगवेगळ्या शाखांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी युवान ग्रुपची अनौपचारिकरीत्या स्थापना केली. या ग्रुपमधील अपूर्व इंगळे, विराज देवांग, आदित्य भागवत, अभिषेक शिंपी, वेदांग जोशी, समाधान भारतीय यांसारख्या २० जणांनी दर शनिवारी, रविवारी सायंकाळी भीमवाडी झोपडपट्टी, अंबिकानगर, आम्रपाली झोपडपट्टी, आनंदवली येथे मुलांना शिकविण्यास जातात.