शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मक्याला तूर्त जीवदान; खरिपाच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 01:03 IST

पावसामुळे मोड फुटण्याच्या तयारीत आलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला असून, काही तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे मक्यावर प्रादुर्भाव केलेल्या लष्करी अळ्यांचा नायनाट करण्यास हा पाऊस फायदेशीर ठरला आहे.

नाशिक : पावसामुळे मोड फुटण्याच्या तयारीत आलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला असून, काही तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे मक्यावर प्रादुर्भाव केलेल्या लष्करी अळ्यांचा नायनाट करण्यास हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने पेरण्यांचा खोळंबा कायम असून, पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यांमध्ये मात्र पेरण्यांचा वेग कमी आहे.जून महिना कोरडा गेल्यावर मान्सूनने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात हजेरी लावली. सिन्नर, येवला, चांदवड, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व दिंडोरी तालुक्याला झोडपून काढणाºया या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकला अधूनमधून पाऊस कायम असला तरी, तेथील भात पिकासाठी तो पुरेसा नसल्यामुळे पेठ, इगतपुरी, सुरगाणा व इगतपुरी तालुक्यात १० ते ३० टक्केच पेरण्या होऊ शकल्या आहेत. येवला, मालेगाव, नांदगाव, सिन्नर या दुष्काळी तालुक्यात पहिल्याच पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवित होऊन त्यांनी सरासरी ८० टक्के पेरण्या पूर्ण केल्या, परंतु पावसाच्या किमान दहा, बारा दिवसांच्या दडीमुळे तेथील पिके धोक्यात आली होती. जमिनीखालून मोड आलेल्या पिकांना पाण्याची गरज असताना उलट उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. मात्र गेल्या शनिवार, रविवारपासून सलग दोन दिवस पावसाने पुन्हा हजेरी दिल्यामुळे या पिकांना तूर्त जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे अपुºया राहिलेल्या पेरण्या पूर्ण होणार असल्या तरी, अजूनही शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे.गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जवळपास सर्वच पेरण्या आटोपल्या होत्या. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. यंदा मात्र पावसाच्या आगमनावर पेरण्या पुढे सरकत असून, ६० टक्क्यावर थांबलेल्या पेरण्या गेल्या दोन दिवसांपासून वाढल्या आहेत. विशेष करून भात लागवडीला वेग आला असून, गेल्या आठवड्यात जेमतेम २८ टक्के भात लागवड झाली होती, ती आता ६० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. मका व बाजरीची पेरणी जवळपास आटोपली आहे.पावसामुळे लष्करी अळी नष्टजिल्ह्णात मक्यावर लष्करी अळीने केलेल्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांसमोर मोठे संकट उभे ठाकले असून, लष्करी अळीने पीक उद्ध्वस्त केल्यामुळे अनेक शेतकºयांनी शेतात पुन्हा ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट केले. परंतु कृषी खात्याच्या म्हणण्यानुसार गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या फटक्यामुळे मक्यावरील लष्करी अळींचा नायनाट होण्यास मदत झाली आहे. मक्याच्या पानांमध्ये, देठांवर असलेल्या अळ्यांना पावसाच्या पाण्यापासून धोका असून, त्यामुळे त्यांचा नायनाट व संक्रमण रोखले जाते.अशा झाल्या पेरण्याजिल्ह्णात खरिपाचे पाच लाख ७५ हजार ५८८ इतके लागवडीचे क्षेत्र असून, त्यापैकी तीन लाख ४४ हजार ९०१ हेक्टरवर म्हणजे ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वाधिक पेरण्या दुष्काळी म्हणून गणल्या गेलेल्या येवला तालुक्यात १११ टक्के झाल्या आहेत. अन्य तालुक्यात पुढीलप्रमाणे पेरण्या करण्यात आल्या आहेत. (टक्केवारीनुसार)* मालेगाव- ८५* बागलाण- ३७* कळवण- ६०* देवळा- ६३* नांदगाव- ८६* सुरगाणा- २५* नाशिक- ४* त्र्यंबक- ५६* दिंडोरी- ११* इगतपुरी- २१* पेठ- ९* निफाड- ३८* सिन्नर- ६९* येवला- १११* चांदवड- ५८

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस